Bapu Chavan raising sheep on dried grass.  esakal
नाशिक

Nashik Rain Crisis : पाणी, चाराअभावी पशुधन विकण्याची वेळ! पाऊस नसल्याने पिके करपली

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने भेगाळलेल्या रानात माना टाकून शेवटचा घटका मोजणारे पिके दोन-तीन दिवसांत हवेने उडून जाईल. कोरडा चारा संपला आहे. पाऊस नसल्याने हिरवा चारा उपलब्ध झाला नाही.

उपलब्ध हिरव्या चाराचे भाव गगनाला भिडले आहे. बळीराजा संकटात सापडलेला दिसून येत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्याचे कैवारी असलेले मायबाप सरकारने दुष्काळ जाहीर करावा, हीच अपेक्षा बाळगून शेतकरी जगत आहे. (Maize millet groundnut and cotton crops started to deteriorate due to lack of rain nashik rain crisis)

जुलैमध्ये थोड्याफार पावसावर पेरण्या झाल्या. त्यानंतर अधूनमधून पडणाऱ्या फवाऱ्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी पिके दमदार होती; मात्र त्यानंतर पावसाला खंड पडल्यामुळे आणि कडक उन्हामुळे पिके करपू लागली. बागायती क्षेत्रात विहिरींनी पूर्ण तळ गाठल्याने आता पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.

तर कोरडवाहू क्षेत्रात वारा वाहू लागल्याने पिके उडून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे. काही ठिकाणी पिकांच्या वाती झाल्या आहेत. जनावरांसाठी चारा म्हणून उभ्या पिकाचे कापणी करून जनावरे कसे जगतील, याकडे शेतकरी पाहत आहेत.

पोटाच्या मुलाप्रमाणे जनावरांना जीव लावत जनावरे जगवले आहेत; पण या पावसाअभावी आता जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी होते म्हणून कांद्याचे उळे टाकलेले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना कांदा लागवड करता येत नाही.

तीन महिने झाले तरी नदी, नाले कोरडेठाक आहेत. शेतात मोठमोठे तडे पडलेले आहेत. पिकांच्या वाती झालेले असून, पाऊस आला तरी पिकांना फायदा होणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरकारने लवकरच दुष्काळ जाहीर करावा व जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात, अशी परिसरातून मागणी होत आहे.

"नांदगाव, चाळीसगाव, मालेगाव तालुक्यांतील गावांना जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरीप हंगाम धोक्यात आल्याने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकऱ्यांना मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा." - दादा बोरसे, माजी सरपंच, साकोरा

"माझ्याजवळ लहान-मोठे २०० मेंढ्या असून, त्यांच्यावर माझ्या कुटुंबातील सात ते आठ लोकांचा उदरनिर्वाह चालतो. पाणी आणि चारा नसल्यामुळे आमच्यावर मेंढ्या विकण्याची वेळ आली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न आम्हा मेंढपाळांना पडला आहे." - बाप्पू चव्हाण, मेंढपाळ, जामदरी

"शेतकरी आपल्या जनावरांना पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावतात. शेतात चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही. जनावरे उपाशी ठेवणे शक्य नाही म्हणून विकण्यासाठी न्यावेत, तर तेही कोणी विकत घेत नसल्याने मोठी पंचायत झाली आहे." -दत्तू सुरसे, सारताळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT