farmer nashik 1.jpg
farmer nashik 1.jpg 
नाशिक

आता तर महावितरणने कळसच गाठला! वीज कनेक्शनचा पत्ता नाही..शेतकऱ्याला बिल पाठवले लाखाचे.. वाचा काय घडले

खंडू मोरे

नाशिक / खामखेडा : लॉकडाउनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल दिले जात असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच येथील एका शेतकऱ्यास शेतात वीज कनेक्शन नसतानाही तब्बल लाखभर रुपयांचे वीजबिल पाठविण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. अत्यंत संतापजनक प्रकार इथल्या शेतकऱ्यासोबत घडला आहे. वाचा नेमके काय घडले?

शेतकऱ्यास नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनस्ताप 
लॉकडाउनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल दिले जात असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच येथील एका शेतकऱ्यास शेतात वीज कनेक्शन नसतानाही तब्बल लाखभर रुपयांचे वीजबिल पाठविण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. त्यातून महावितरणच्या कामकाजातील गोंधळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे,   कोटेशन भरून नऊ वर्षे झाली, तरीही महावितरणने वीज कनेक्शन दिले नाही अन्‌ संबंधित अर्जदार शेतकऱ्याला चक्क ९८ हजार ४५० रुपयांचे बिल पाठविले आहे. खामखेडा येथील भाऊसाहेब तानाजी अहिरराव यांनी १२ मार्च २०११ ला वीजपंपासाठी चार हजार ८१० रुपयांचे कोटेशन महावितरणच्या ठेंगोडा केंद्राकडे दाखल केले. शेतात वीज येईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, नऊ वर्षे उलटूनही ना शेतात विजेचे खांब आले ना विजेची तार. आले ते फक्त विजेचे लाखभर रुपयांचे बिल! त्यामुळे विजेचा लाभ तर दूरच उलट चांगलाच मनस्ताप झाला आहे. या नऊ वर्षांत त्यांनी वीज कनेक्शनसाठी महावितरणचे उंबरठे झिजविले. अखेर कंटाळून कनेक्शनची आशा सोडून दिली. असे असताना महावितरणने मात्र भोंगळ कारभाराचा कळस गाठत त्यांना विहिरीवरील वीज वापराचे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ९८ हजार ४५० रुपये बिल पाठविले आहे. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना
  
मी अल्पभूधारक शेतकरी असून, नऊ वर्षांपूर्वी शेतात विहिरीसाठी वीज कनेक्शन मिळावे, यासाठी अर्ज  केला होता. मात्र, अद्यापही माझ्या शेतात कनेक्शन देण्यात आले नाही. आता मात्र महावितरण कंपनीने लाखभर रुपयांचे वीजबिल पाठवून नसता मनस्ताप दिला आहे.  -भाऊसाहेब अहिरराव, शेतकरी, खामखेडा 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतून संबंधित शेतकऱ्यास ऑगस्ट २०१२ मध्ये वीजजोडणी दिली. तेव्हापासून वीजवापराचे बिल दिले जात आहे. संबंधित शेतकऱ्याचा संबंधित कनेक्शनवर वापर नसल्याची  चौकशी करून त्यांची तक्रार व मागणी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल.  -राजेश हेकडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, देवळा  

रिपोर्ट - खंडू मोरे

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT