डाळिंब sakal
नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील १० हजार हेक्टरवरील डाळिंब बागा संकटात

बदलत्या वातावरणामुळे उत्तर महाराष्ट्रात फुलगळ

गोकुळ खैरनार -सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहर व परिसरात आठवड्यापासूनचे ढगाळ वातावरण, दोन दिवसांपासून होत असलेला बिगरमोसमी पाऊस तसेच तापमानात झालेली घट व हवेत वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक डाळिंबबागा संकटात आल्या आहेत. त्यातच हस्त बहारातील डाळिंबाची मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असल्याने भविष्यात उत्पनावर त्याचा परिणाम होऊ शकेल. बदललेल्या वातावरणामुळे तापमानात प्रचंड घट झाली असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

सध्याचे वातावरण डाळिंबावरील तेल्या रोगास पोषक आहे. या वातावरणामुळे तेल्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. कसमादेसह उत्तर महाराष्ट्रातून मर व तेल्यारोग हद्दपार झाला होता. त्यामुळे खानदेशात डाळिंबाचे क्षेत्र ४५ हजार हेक्टरवर पोचले आहे. गेल्या वर्षांपासून काही ठिकाणी तेल्या रोग पुन्हा डोके वर काढू पाहात आहे. कृषी विभाग व शेतकरी रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच तीन दिवसांपासून राज्यात बिगरमोसमी पाऊस पडत आहे. पाऊस होतानाच तापमान कमालीचे घटले आहे.

१५ ते १७ अंशापर्यंत तापमान खाली आले आहे. हुडहुडी भरणारे वातावरण फळ पिकांसाठी मारक आहे. तापमान खाली घसरले असतानाच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कडाक्याच्या थंडीतही सामान्य परिस्थितीत आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा खाली राहते. कमी झालेले तापमान व हवेतील आर्द्रता तेल्या रोगाची पाळेमुळे पसरवू शकते. सध्या मृग बहारातील डाळिंबाची काढणी अखेरच्या टप्प्यात आहे. भाव शंभरपेक्षा अधिक आहे. डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हस्त बहार मोठ्या प्रमाणात धरला आहे. काही बागांचे सेटिंगचे कामदेखील झाले आहे.

बिगरमोसमी पाऊस व सध्याच्या वातावरणात हस्त बहारात मोठ्या प्रमाणात फुलगळ होत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होऊ शकेल. सध्याच्या वातावरणाचा फटका ज्या झाडांवर फळे आहेत, अशांना अधिक प्रमाणात बसणार आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे झाडांना अन्नद्रव्याची पुरेशी उपलब्धता होत नाही. त्यातच मधमाशा पोळ्यांमध्ये खिळून बसतात. त्या बाहेर येत नाहीत. अशा परिस्थितीत वातावरण लवकर निवळणे पिकांसाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी तेल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने केलेल्या शिफारशीनुसारच बुरशीनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे.

ढगाळ वातावरण व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे डाळिंबाच्या झाडांची क्रियाशीलता मंदावते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्पर्शजन्य कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा. यामुळे तेल्या रोग नियंत्रणात राखता येईल.

-सचिन हिरे, कृषी शास्त्रज्ञ, डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT