school. 
नाशिक

अरेच्चा! आता जिल्हाधिकारी, तहसीलदार होणार गुरुजी! शिक्षण विभागाचा ‘एक दिवस शाळे’साठी उपक्रम

संतोष विंचू

नाशिक/येवला : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या, सुविधा, गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘एक दिवस शाळे’साठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांपासून ते वर्ग दोनचे अधिकाऱ्यांना एका वर्षात किमान तीन शाळांना भेटी देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शिक्षक अन् विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. 

ग्रामीण शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, पायाभूत सुविधांबाबत समस्या, तसेच विविध अडचणींची सोडवणूक व्हावी आणि विद्यार्थ्यांना शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शाळांना भेट व मूल्यमापनासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सनियंत्रण ठेवले जाणार असून, जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग १ व २ चे अधिकारी यांना या शाळा भेटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. 

शाळेकडे ओढा वाढवण्यासाठी प्रयत्न

उपक्रमांतर्गत अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस तरी शाळेत भेट किंवा चालू अभ्यासक्रमाच्या काही भागाचे अध्यापन करावे व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे, असेही यामध्ये अभिप्रेत आहे. शिवाय शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे ओढा वाढविण्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत. शाळेच्या भौतिक सुविधांचा व खेळाचा दर्जा, पूरक व्यवस्था, स्वच्छता, पोषण आहार यांचादेखील आढावा या भेटीत घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, धोकादायक बांधकामे, शौचालय यांसारख्या मूलभूत समस्या संदर्भातही पावले उचलावे लागणार आहे. 
भेटीदरम्यान मूल्यमापन सूचीही निश्चित करण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी भौतिक व इतर सुविधा, पोषण आहार, शालेय प्रगती, समित्यांचे गठन, पटसंख्या, बायोमेट्रिक आदी घटकांची तपासणी करून त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुणदान करायचे आहे. 

 
शाळा प्रवेशाचे वय निश्चित! 

शासनाने बालकांच्या शाळा प्रवेशासाठीचे किमान वय प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार निश्चित झाले आहे. आता बालकाला प्लेग्रुप व नर्सरी (इयत्ता पहिली पूर्वीचा तिसरा वर्ग) प्रवेश घेताना किमान वय ३ वर्ष किंवा अधिक असावे, तर इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेताना किमान वय सहा वर्षांहून अधिक असण्याचे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर ही तारीख गृहीत धरली जाणार आहे. सर्व माध्यमांसाठी आता प्रवेश देताना हाच वयाचा निकष गृहीत धरावा लागणार आहे. 

उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी गावोगावच्या शाळांना भेटी देण्याचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शाळेची गुणवत्ता वाढणार तर आहेच; पण त्यांच्या ज्ञानाचा आणि सूचनांचा शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल. 
-रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक

संपादन-  रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT