onion crops.jpg 
नाशिक

कांदालागवडीचा एकरी दर दहा हजारी; मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू

जलील शेख

मालेगाव (जि.नाशिक) : तालुक्यासह कसमादेत रब्बीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच उन्हाळ कांदालागवडीची अक्षरश: धूम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावरील लग्नसोहळे व ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कधी नव्हती एवढ्या प्रमाणावर मजूरटंचाई जाणवत आहे. यामुळे गुजरात सीमेवरील आदिवासी मजुरांना पायघड्या घालाव्या लागत आहेत.

मजूरटंचाईने बळीराजा त्रस्त

दरम्यान, कांदालागवडीचा दर एकरी दहा हजारांवर गेला आहे. एकरासाठी कांद्याचे रोप २० ते २५ हजार रुपयांना मिळत आहे. महागडे रोप व मजूरटंचाईने बळीराजा त्रस्त झाला आहे. मात्र पाण्याची उपलब्धता व मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची कांदालागवडीसाठी धावपळ सुरू आहे. 
या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यासह कसमादेत वेळोवेळी पाऊस होत गेला. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले. पीक दृष्टिक्षेपात आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान झाले.

मजुरांच्या टंचाईमुळे आदिवासी मजुरांसमोर शेतकऱ्यांच्या पायघड्या 

शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये टाकलेली रोपे जास्त पावसामुळे सडली. परिणामी रोपांची नव्याने लागवड करण्यात आली. रोपे तयार झाल्यानंतर काद्यांची लागवड एकाच वेळी सुरू झाल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. त्यातच कसमादेतील मजूर या वर्षी विक्रमी संख्येने ऊसतोडणीसाठी कारखाना स्थळावर गेले आहेत. बहुसंख्य मजूर डाळिंबावरील छाटणीसाठी गुजरात व राजस्थानमध्ये गेल्याने शेतकऱ्यांना मजूरटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

आदिवासी मजुरांकडे लक्ष 
रब्बीच्या क्षेत्राबरोबरच कांदालागवड जोमात आहे. गाव व परिसरातील मजूर त्या-त्या भागात विखुरले गेले आहेत. क्षेत्र वाढल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ताहाराबाद, मुल्हेर, अंतापूर, गोळवाड आदी गुजरात सीमेलगतच्या आदिवासी भागातून मजूर आणण्यावर भर दिला जात आहे. हे मजूर मक्ता पद्धतीने कांदालागवड करतात. एकरी नऊ ते दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. शिवाय मजुरांच्या ने-आणसाठीचा वाहन खर्चही शेतकऱ्यांना द्यावा लागतो. सध्या कांद्याचे रोप महागले आहे. एका एकरासाठी २० ते २५ हजार रुपयांचे रोप लागत आहे. 

कांदालागवड व खरिपाची कामे एकाच वेळी सुरू झाल्याने मजुरांची कधी नव्हती एवढी टंचाई निर्माण झाली आहे. माळमाथा व काटवनमधील हजारो कामगार ऊसतोडणीसाठी गेल्याने मजूर मिळणे अवघड झाले आहे. रोजाने मजूर काम करीत नाहीत. नऊ ते दहा हजार रुपये एकरी लागवडीचा खर्च आहे. शेतकऱ्यांना नाइलाजाने महागडे रोप व मजुरी द्यावी लागत आहे. -पवन ठाकरे, शेतकरी, खाकुर्डी  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT