Citizens have to drink dirty water.
Citizens have to drink dirty water.  esakal
नाशिक

Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात गढूळ पाणीपुरवठा; भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा

के.टी. राजोळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्वतःच्या शेकडो एकर जमिनी धरणासाठी दिलेल्या तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.

मात्र त्यांना गढूळ पाण्याशिवाय काहीही पर्याय उरत नसल्याचे तालुक्यातील चित्र आहे. या गावांना टॅंकरने पाणीपुरवठ्याची गरज असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. (water scarcity Dirty water supply in Igatpuri taluka nashik news)

शेतीला पाणी, तरुणांच्या हाताला काम व पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला जाईल या आशेवर शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या. मात्र झाले उलटेच, महिलांच्या डोक्यावरील हंडा तर उतरला नाहीच उलट गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.

धरणग्रस्त शेतकऱ्यांची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी अन्यथा एल्गार कष्टकरी संघटना रिकामे हांडे घेऊन जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणासाठी जमीन दिलेल्या वळविहीर येथील आदिवासी वाडी वस्तीवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा करण्याची शासनाची योजना आहे.

परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी ही योजना आहे, की ठेकेदार व अधिकाऱ्याच्या आर्थिक पुनर्वसन करण्याची आहे असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग आणि मंत्री असताना देखील आदिवासींची दयनीय अवस्था आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही राखीव दिवस; पावसामुळे सामना रद्द झाला तर कसा लागणार निकाल?

Latest Marathi News Live Update: बारामतीत बारावीचा निकाल 96.32 टक्के.....

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडद रंगाच्या लोकांना आफ्रिकन म्हंटले नाही; क्लिप केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचा दावा

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

SCROLL FOR NEXT