nagarpanchayat election will held in march in amravati division 
विदर्भ

नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल मार्चमध्ये, विदर्भातील ४३ ठिकाणी रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्यातील मुदत संपलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून साधारणतः मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. अमरावती विभागातील १३ नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे, तर विदर्भातील तीन नगरपरिषद व ४३ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.

विभागातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा, नांदगावखंडेश्‍वर, भातकुली व धारणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा या नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आली होती. कोरोना संक्रमणामुळे या नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ते बंधन आता हटविण्यात आले असून निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. 

नगरपंचायत व नगरपरिषदांसाठी प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून १५ जानेवारी २०२१ ची यादी अंतिम मानण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीस प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एक मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT