congress agitation at rajbhawan to meet governor koshyari in nagpur 
नागपूर

VIDEO : उपराजधानीत काँग्रेसचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे रद्द करण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घेण्याची मागणी

अतुल मेहेरे

नागपूर : केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आज शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढला. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोर्चा राजभवानपर्यंत पोहोचला. त्यानंतर राजभवनाला घेराव घालण्यात आला. 

आज निघालेला मोर्चा मुंबई येथे नियोजित होता. पण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी नागपुरात असल्यामुळे आज राजभवनाला घेराव करण्यात आला. शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी रातोरात कार्यकर्त्यांनी मोर्चाची तयारी केली. आजच्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे आमदार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. काळ्या कृषी कायद्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने युवक आणि व्यावसायिक तर गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने गृहिणी अडचणीत आल्या आहेत. तरीही केंद्र सरकारला जाग येत नसल्यामुळे आज देशभरात काँग्रेसने राजभवनाला घेराव टाकण्याचे आंदोलन केले आहे. 

नागपुरात राजभवनासमोर एकाच ठिकाणी नव्हे तर काटोल नाका चौक, छावणी मार्गासह चारही बाजूंनी काँग्रेसचे कार्यकर्ते आले आणि घेराव केला. जेथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे, तेथे आज सकाळपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजभवनासमोरून होणारी वाहतूक काटोल नाका चौकातून वळवण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महागाईने होरपळलेली जनता, काळ्या कृषी कायद्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी आणि सिलिंडरच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या. 

राज्यपालांनी करावा कृषी कायद्याचा विरोध -
ज्या कृषी कायद्यामुळे गेल्या ५० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. त्यापैकी काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरीही सरकारला पाझर फुटलेला नाही. शेतकरी जगला तर देश जगेल. त्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी काळा कृषी कायदा रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांना करणार असल्याचे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT