जलालखेडा ः मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या कापसाच्या गाड्या.  
नागपूर

अरे देवा, कापूस खरेदीला अचानक लागला "ब्रेक', कारण काय...

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर):  आधीच कासवगतीने सुरू असलेल्या कापसाच्या खरेदीला वारंवार "ब्रेक' लावण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे हवामान खात्याने पावसाचा "अलर्ट' जाहीर केला, तर दुसरीकडे नरखेड तालुक्‍यात कापसाच्या शासकीय खरेदीला "ब्रेक' दिला. आता ही खरेदी किती दिवस बंद राहणार, हा खरा प्रश्न आहे.
नक्‍की हे वाचा : नोंदणीक्रमांक 2676, दिवस लागतील तीस, सांगा बांधवांनो, काय करायचे...

कापूस घरीच सडण्याची चिंता
खरीप हंगाम तोंडावर असतानादेखील त्याचा मागील हंगामातील कापूस अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आता पावसाळा असल्यामुळे पाऊस राहणारच, त्यामुळे अशीच कापूस खरेदी बंद राहिली तर शेतकऱ्यांचा कापूस घरीच राहण्याची किंवा कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : कुख्यात रोशन शेख गॅंगवर मोक्‍का

बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप
बुधवारी सकाळपासूनच पावसाने रिपरिप लावल्यामुळे अनेक कापसाच्या गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. पण, सायंकाळी अचानक मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी आठपर्यंत येथील खरेदी केंद्रावर तब्बल 23 गाड्या उभ्या होत्या. त्या आज ओल्या झाल्या. जलालखेडा येथील कापूस खरेदी केंद्रावर असलेल्या ग्रेडरकडून कापसाचा ओलावा योग्य प्रकारे व शेतकऱ्यांना न दाखवता घेण्यात येत असल्याची अनेकांची ओरड आहे. आजपर्यंत नरखेड तालुक्‍यात असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर फक्त दोन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. कापूस विक्रीसाठी सात हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाली आहे. अजूनही पाच शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होणे बाकी आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. खरेदी वारंवार बंद करण्यात येत आहे. अशात पाच हजार कापसाची खरेदी होणार की नाही, असा प्रश्‍न आहे.

जास्तीत जास्त खरेदीचा प्रयत्न
शेतकऱ्यांच्या समोरच त्यांच्या कापसाचा ओलावा तपासला जात आहे. जास्त कापूस खरेदी करण्यात येत असल्याने त्याच दिवशी शेतकऱ्यांना बिल देणे अवघड होते. तसेच कापसाच्या ग्रेडनुसारच भाव भरण्यात येत आहे. अद्यापही कोणी शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. शेतकऱ्यांचा कापूस जास्तीत जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न आहे.
दिलीप कांबळे, ग्रेडर, सीसीआय कापूस खरेदी केंद्र, जलालखेडा

पावसाचा जोर राहिला तर खरेदी बंद
हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. म्हणून बुधवारी कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढे पण एक दोन दिवस कापूस
खरेदी बंद राहू शकते. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तहसीलदारांमार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे खरंच कापूस आहे का, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सतीश येवले, सचिव, नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात तेरावा! उड्डाणपुलाचं काम, त्यात बस-ट्रकचा अपघात; वाहतूक कोंडीत अडकले पुणेकर

Pune Student Attack : पुण्यात धक्कादायक घटना ! क्लास सुरु असताना वर्गमित्रानेच गळा चिरुन विद्यार्थ्याला संपवले; दप्तरात चाकू घेऊन आला अन्...

Stock Market Today : शेअर बाजार लाल! ऑटो सेक्टरला मोठा फटका; Corona Remedies IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

'...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर आहे'; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराजांबद्दल काय सांगितलं?

IND vs SA 3rd T20I: १२,५,१२ धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणतो, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय...

SCROLL FOR NEXT