मुंबई : राज्यात आज दिवसभरात 2,692 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,59,349 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 2,716 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,80,670 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.28 टक्के एवढं झालं आहे.
दरम्यान, आज राज्यात 41 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळं मृतांचा एकूण आकडा 1,39,207 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 35,888 इतकी आहे.
नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 4, नाशिक 22, पुणे 10, कोल्हापूर 4, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,43,152 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.