राहुल गांधींकडून विराटच्या राजीनाम्याची दखल, 'अशा परिस्थितीत...'
Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघातील (Indian Criceket Team) आघाडीचा फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा (Steps Down From Captancy) दिला. आफ्रिकेविरुध्दचा पराभव विराटच्या जिव्हारी लागल्यानं त्यानं राजीनामा दिल्याचे सांगितलं जात आहे. त्यानं घेतलेल्या या मोठ्या राजीनाम्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून कोहली आणि त्याचं कर्णधारपद यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली होती. यापूर्वी कोहलीनं एकदिवसीय आणि टी 20 चं कर्णधारपद सोडण्याचाही निर्णय घेतला होता.
राहुल गांधींनी (Mp Rahul Gandhi) प्रतिक्रिया दिली आहे. यासगळ्या परिस्थितीत विराटच्या पाठीशी सगळा देश उभा आहे. त्यानं आतापर्यत देशाला खूप काही दिलं आहे. त्यामुळे आम्ही सगळे त्याच्या पाठीशी असून त्याला आमचा पाठींबा असल्याची प्रतिक्रिया राहुल यांनी दिली आहे. दुसरीकडे राहुल यांनी जाणीवपूर्वक दिलेल्या प्रतिक्रियेवरुन अनेकांनी त्यांनाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, विराट आम्हाला तू खुप आनंद दिला आहे. तुझ्या खेळानं लाखो फॅन्सला आनंद मिळाला आहे. त्यांनी तुझ्य़ा खेळावर प्रेम केलं आहे. तुझ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून तुला नक्कीच बळ मिळेल. असेही राहुल यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे त्याने वन-डेचे कर्णधारपद गमावले आहे. (Cricketer Virat Kohli steps down as India Test captain)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.