CORONA-VIRUS : निलंग्यात कोरोनाचा तिसरा बळी

corona death.jpg
corona death.jpg

निलंगा (लातूर) : कोरोनाचा संसर्ग दिवसेदिवस वाढत असून मदनसुरी (ता. निलंगा) येथील एकाचा उपचार घेत असतांना सोमवारी (ता. सहा) रोजी रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे निलंगा तालुक्यातील कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असून यापूर्वी निलंगा येथे आलेल्या आठ बाधित परप्रांतीय तंदुरुस्त होऊन गावाकडे परतले. त्यानंतर शहरात व तालुक्यात कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नव्हता. त्यातच मदनसुरी येथे कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर औराद शहाजानी येथे एक महिला मुंबईहून आली होती ती बाधित निघाली कोरोना संसर्गाचा आकडा कमी असतानाच निलंगा येथे इंदीरा चौकात एक रुग्ण आढळून आला.

त्याच्या संपर्कातील व मदनसुरी येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सत्तावन्न जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. त्यापैकी सर्वाचे स्वॕब तपासणीला पाठवले असता निलंगा शहरातील व मदनसुरी येथील एकूण १७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

त्यामुळे त्या ठिकाणी कंटेनमेंट तयार करण्यात आला असून नागरिकांना बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच औंढा ता. निलंगा येथे एका रुग्णाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यामुळे उमरगा जि. उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला परंतु संबंधित रुग्णाची अंत्यविधी झाल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव आला होता.

मदनसुरी येथील बाधित रुग्णावर उदगीर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम व गावचे सरपंच शालुबाई माने यांनी दिली. त्यामुळे निलंगा तालुक्यातील कोरोनाचा तिसरा बळी झाल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सध्या मदनसुरी येथे कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले असून ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय गावातून बाहेर जाण्यास व गावांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली असून गावातील नागरिकांनी कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने केले आहे. गावात निर्जंतुकीकरणची फवारणी करण्यात आली असल्याचेही सरपंच श्रीमती शालुबाई माने यांनी सांगितले. 

फिजिकल डिस्टन्सचा फज्जा

निलंगा शहरात ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील नागरिकांचा संपर्क येत असतो. त्यामुळे शहरात विविध दुकाने शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. नागरिकांकडून मास्क लावण्यात येत नाही. फिजिकल डिस्टन्स पाळण्यात येत नाही त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाचा फज्जा उडाला आहे. विविध बँका शासकीय कार्यालय आदी ठिकाणी राजरोस नागरीक वावरत असून टू व्हीलर फोर व्हीलर वरतीही नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे आकडे पोलीस व तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com