Nirmala-Sitharaman 
अर्थविश्व

Budget 2020 : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न; प्राप्तीकरातून दिलासा

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने सरकराने पाऊल टाकले असून, काही धडाकेबाज निर्णय घेत आज (शनिवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षात देशाचा आर्थिक विकासदर (जीडीपी) 10 टक्के राहील असा अंदाज वर्तवत, प्राप्तिकर रचनेत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

तर, एलआयसीतील भागीदारी विकणे, बँकांचे विलीनीकरण आणि बँकांमधील गॅरंटीची मर्यादा वाढविणे असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. 

निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. लाल रंगाच्या चोपड्यातून अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणण्याची परंपरा यावर्षीही कायम होती. जीएसटी करप्रणालीमुळे फायदा झाल्याचे सांगत सीतारामन यांनी याचे श्रेय माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांना दिले. तसेच त्यांनी जीएसटीसाठी 1 एप्रिलपासून नवी प्रणाली आणणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

जीएसटीमुळे अनेक कर कमी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रासाठी सरकराने भरीव तरतूद केल्याचे पाहायला मिळाले असून, मुद्रा योजना कृषी क्षेत्रातही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. झिरो बजेट शेतीला सरकार प्राधान्य देणार आहे. मत्स्य आणि दूध उत्पादनासाठी सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत.

सरकारने पीपीपी मॉडेलअंतर्गत 5 नवी स्मार्ट शहरे उभारण्याचा निर्णय घेतला असून, स्टार्टअपसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात येणार आहे. सरकारने अनेक नव्या योजना व निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने निर्यातदारांसाठी नार्विक योजना, आरोग्यासाठी मिशन इंद्रधनुष्य, टीबी हारेगा, देश जितेगा, ऑनलाईन पदवी मिळविता येणार, पंतप्रधान कुसुम योजना आदींचा यामध्ये समावेश आहे. 

भारत ही देशातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून, अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यावर सरकार भर देणार आहे. पर्यटन, संस्कृती, पर्यावरण, महिला, एससी-एसटी यासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. बँकांबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

एलआयसीमधील सरकारी हिस्सा विकण्याचा निर्णय घेत, 10 बँकांचे विलिनीकरण करून 4 बँका करण्यात येतील हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हवाई क्षेत्रातील प्रगती पाहता नवी 100 विमानतळे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

Latest Marathi News Live Update : मंत्री गोगावले यांचा राज ठाकरे यांना पलटवार; “उद्धव ठाकरेंसोबत जाणं ही सत्तेसाठीची लाचारी नाही का?”

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद , जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT