survey
survey sakal
देश

भारतात वेगाने वाढतयं अविवाहितांच प्रमाण, तरुणांचं लग्नाचं सरासरी वय २ वर्षांनी वाढलं

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संस्कृतीत विवाहाबाबत वयाचे अनेक बंधने आहेत. योग्य वयात विवाह केला पाहीजे, अशा मान्यता आहे. पण एका सर्वेक्षणामध्ये भारताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाच्या लोकसंख्येमध्ये अविवाहित तरुणांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहेत.

एका सर्वेक्षण अहवालानुसार, 2011 मध्ये देशातील एकूण तरुण लोकसंख्येपैकी अविवाहित तरुणांची संख्या 17.2% होती, मध्ये 2019 मध्ये 23 टक्के झाली होती तर याचा आकडा आणखी वाढत आहे. याशिवाय तरुणांचे लग्नाचे वयही वाढले आहे. तरुणांचं लग्नाचं सरासरी वय २ वर्षांनी वाढल्याचीही माहिती समोर आली आहे.

नॅशनल स्टॅटिस्टीक्सच्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, कधीही लग्न न केलेल्या तरुणांची संख्या 2011 मध्ये 20.8 टक्क्यांवर होती ती आता 26 टक्क्यांहून अधिक झाली आहे तर लग्न न केलेल्या महिलांची संख्या देखील 2011 मध्ये 13.5% होती, जी आता 20 टक्क्यांहून अधिक झाली आहे.

या अहवालात अविवाहित तरुणांचे प्रमाण वाढण्याचे कोणतेही कारण दिलेले नसले तरी भारतात लवकर विवाह करण्याची जी प्रथा होती ती झपाट्याने कमी झाल्याचे यात सांगितले.

लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वात जास्त अविवाहित तरुण जम्मू आणि काश्मीरमध्ये होते, त्यानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये होते. तर केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ही संख्या सर्वात कमी होती. लग्नाच्या वयाच्या संदर्भात गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

तरुणांची संख्या कमी होणार

2011-2036 च्या भारताच्या लोकसंख्येवरील अंदाजानुसार, 2021 मध्ये, भारताच्या एकूण 136 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 27.3 टक्के लोक हे 15-29 वयोगटातील तरुण होते. 2036 पर्यंत लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण कमी होऊ लागेल, असे या अहवालात म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT