Asaduddin Owaisi esakal
देश

देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचंही योगदान, टिपू सुलतानचं बलिदान विसरू शकत नाही : ओवैसी

'ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना कसं विसरता येईल?'

सकाळ डिजिटल टीम

'ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना कसं विसरता येईल?'

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नुकतंच हैदराबादमध्ये (Hyderabad) एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी ओवैसींनी भारताच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांच्या (Muslim) भूमिकेचा उल्लेख केला. 1947 च्या युद्धात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, असंही ओवैसी म्हणाले.

याआधीही देशात अनेक लढाया झाल्या, यात मोठ्या संख्येनं लोकांचे प्राण गेले. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना कसं विसरता येईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एमआयएम प्रमुख पुढं म्हणाले, 1857 मध्येही युद्ध झालं होतं. याशिवाय, देशात अनेक युद्धं झाली. या देशाच्या स्वातंत्र्यात आपल्या धर्माच्या (मुस्लिम) लोकांचंही मोठं योगदान आहे. सिराजुद्दौला आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचं बलिदान आपण कसं काय विसरू शकतो? असा सवालही त्यांनी केलाय.

दरम्यान, 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार अमृत महोत्सवही (Amrit Festival) साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सरकारनं हर घर तिरंगा अभियानही (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT