Lockdown 
देश

धक्कादायक : देशात लॉकडाउननं घेतला ३०० जणांचा बळी; भितीतून आत्महत्येच्याही घटना

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरू असून यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यमागे कोरोना संसर्ग नाही तर अन्य कारणे असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

हे संशोधन २ मेपर्यंत असून त्यानंतरही काही नागरिकांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे. आजच औरंगाबाद येथे रेल्वेच्या धडकेने १६ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे मजूर मध्यप्रदेशातील होते. 

संशोधकांच्या गटात जनहित तज्ञ तेजेश जीएन, सामाजिक कार्यकर्त्या कनिका शर्मा, जिंदल ग्लोबल स्कूल ऑफ लॉ चे सहायक प्रोफेसर अमन यांचा समावेश आहे. १९ मार्च ते २ मेपर्यंत देशभरात विविध ठिकाणी आणि घटनांत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. संशोधकांच्या मते, संसर्गाच्या भीतीने, एकटेपणाला घाबरुन आणि प्रवासावर बंदी घातल्याने अनेकांनी आत्महत्या केली आहे.

उदाहरणार्थ. दारू न मिळाल्याने सात जणांनी आफ्टर शेव लोशन आणि सॅनिटायजरचे प्राशन केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विलगीकरणात राहणाऱ्या मजुरांनी संसर्गाच्या भीतीने किंवा कुटुंबापासून दूर राहिल्याने निराश होऊन आत्महत्या केली किंवा त्यांचा धास्तीने मृत्यू झाला. या आकडेवारीसाठी वर्तमानपत्र, वेब पोर्टल आणि सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

लॉकडाउनमुळे वाहतूक बंद राहिल्याने आणि राज्याच्या सीमा सील केल्याने स्थलांतरित मजुरांची स्थिती शोचनिय झाली. त्यामुळे काही मजूर पायी, सायकलवरुन किंवा दुचाकीवरून निघाले. गेल्या महिन्यात तेलंगणात काम करणारे छत्तीसगडचे कुटुंब पायीच गावी निघाले. परंतु वाटेत त्यांच्या लहानग्या मुलीचा मृत्यू झाला. अतिथकव्यामुळे आणि सतत चालल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला. मृतांत स्थलांतरित मजुरांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारण मृतांची संख्या
आत्महत्या ८० 
रस्ता अपघात ५१ 
भेसळयुक्त दारू ४५
भूक किंवा चणचण ३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT