Corona-Tablighi 
देश

Coronavirus : तबलिगींमुळे आठवडाभरात वाढू शकतात १ लाख कोरोना रुग्ण!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना कधी एकदा घराबाहेर पडतोय असे झाले आहे. त्यामुळे १७ मे रोजी केंद्र सरकार लॉकडाऊन शिथिल करणार का? याकडेच सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

मात्र, तबलिगींमुळे येत्या एक आठवड्याच्या कालावधीत देशात कोरोनाचे १ लाख रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे रोहतक येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्या अडचणींत आणखी भर पडणार असल्याचे या रिपोर्टमुळे दिसून येते. 

राजधानी दिल्ली येथे १३ ते १५ मार्च रोजी तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमास जमलेले नागरिक देशभरात सर्वत्र विखुरले गेले. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होऊ लागल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. या कार्यक्रमाला एक महिना उलटून गेल्यावर म्हणजे १५ एप्रिलला देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजाराच्या घरात होती. आणि १५ मेनंतर यामध्ये भर पडत ती दीड लाखाच्याही पुढे जाईल, असा अंदाज आयआयएमने व्यक्त केला आहे. 

तबलिगींमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ होईल. दिल्ली आणि मुंबई येथे सर्वात जास्त प्रकरणे समोर येतील, असेही या अहवालात म्हटले आहे. आयआयएमचे संचालक धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमोल सिंग, डॉ. अभय पंत आणि त्यांच्या टीमने याबाबतचा अभ्यास केला आहे. 

शर्मा म्हणाले की, १४ एप्रिलला लॉकडाऊन हटविला जाईल, असे सर्वांना वाटत होते. या दृष्टीने आम्ही देशातील कोरोना परिस्थितीचा अभ्यास करण्यास सुरवात केली होती. कोरोनाला रोखायचं असेल तर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी लागेल, असेही मत या अहवालात नोंदविले आहे.

शर्मा आणि त्यांच्या टीमने www.covid19india.org या संकेतस्थळावरील सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा आधार घेत काही गणितीय समीकरणांद्वारे विश्लेषण करत सदर अहवाल तयार केला आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर पहिल्या महिन्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास तीन पटीने वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

अहवालात जाहीर केलेले आकडे आणि देशात समोर आलेल्या कोरोना केसेस यामध्ये जवळपास ९३ टक्के अचूकता असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६७ हजारांहून अधिक आहे. आणि येत्या आठवडाभरात हाच आकडा दीड लाखाच्याही पुढे जाऊ शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आठवडाभरात सुमारे एक लाख रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. हे जर रोखायचं असेल, तर सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेच लागतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT