Kargil Vijay Diwas  sakal
देश

Kargil Vijay Diwas: कोणत्याही राजकीय पदावर नव्हते तरी मोदी गेले होते कारगिल युद्धभूमीवर

कारगिल युद्धातील शूर सैनिकांशी पंतप्रधान मोदींचे संबंध खूप जवळचे होते.

सकाळ डिजिटल टीम

आज कारगिल विजयाला 24 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 जुलै हा देशवासीयांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भारताने कारगिलमध्ये मोठा विजय मिळवला जो आजही देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. या कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले होते. या युद्धादरम्यान अनेक सैन्य शहीद झाले.

याच युद्धाच्यावेळी अनेकांनी कारगिलला जाऊन जवानांचा भेट घेतली होती. पण तुम्हाला माहिती आहे का या भेट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

कारगिल युद्धातील शूर सैनिकांशी पंतप्रधान मोदींचे संबंध खूप जवळचे होते. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान, मोदी यांना कारगिलला आणि देशाच्या शूर सैनिकांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. हा तो काळ होता जेव्हा नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षासाठी काम करत होते.

कारगिलला भेट देण्याचा आणि सैनिकांशी संवाद साधण्याचा अनुभव मी कधीही विसरणार नाही, असे त्यांनी कारगिल युद्धाची आठवण करताना म्हटले.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातच युद्धस्मारक उभारणीची घोषणा केली होती. स्वतंत्र भारतात नेहरू सत्तेवर बसले तेव्हापासून अशा युद्धस्मारकाची मागणी होत होती.मात्र मोदींनी हे त्यांच्या कार्यकाळातच करुन दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT