Govt New Rule esakal
देश

Govt New Rule: सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; शासनाकडून आयटी नियमांत मोठे बदल

भारत सरकारने आयटी नियमांत केले मोठे बदल

सकाळ डिजिटल टीम

Government Rule: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची मनमानी रोकण्यासाठी केंद्र सरकारने आता आयटी नियंमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नव्या आयटी नियमांअंतर्गत आता ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारताचे आयटी नियम अनिवार्य होणार आहेत. त्यामुळे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला अल्गोरिदमच्या नावाखाली त्यांची मनमानी करता येणार नाही.

नव्या आयटी नियमांच्या नोटिफिकेशनअंतर्गत ९० दिवसांत अपीलेट पॅनल (Grievance Appellate Panel) तयार करण्यात येईल. या बदलामुळे संवेदनशील कंटेंटवर २४ तासांच्या आत कारवाई करण्यात येईल.

नव्या आयटी रूल्सचे नोटिफिकेशन जारी

1) नव्या आयटी नियमानुसार, कंपन्यांना सेवा नियम आणि गोपनीयता धोरणाशी संबंधित माहिती त्यांच्या वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन किंवा दोन्हीवर उपलब्ध करून द्यावी लागेल.

2) नवीन आयटी नियमांमधील प्रस्तावित बदलांमध्ये, मध्यस्थ कंपन्यांना भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरी हक्कांचा आदर करणे देखील आवश्यक असेल.

3) तक्रारींचं निवारण करण्यासाठी ७२ तासांचा अवधी दिला जाईल. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याबाबत मध्यस्थ कंपनीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर, 72 तासांच्या आत प्राथमिक कारवाई केली जाईल.

4) अन्य काही तक्रारींच्या आधारे १५ दिवसांच्या आत अॅक्शन घेण्यात येईल जेणेकरून आक्षेपार्ह कंटेट व्हायरल होता कामा नये.

यात विशेष म्हणजे नवीन आयटी नियमांमध्ये वापरकर्त्यांच्या अधिकारांची काळजी घेण्यात आली आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंसा पसरवणाऱ्या पोस्टवर कारवाई करावी लागेल.

टेक कंपन्यांना भारताच्या संविधानाचे पालन करावे लागेल. यूजर्सच्या तक्रारींची २४ तासांच्या आत दखल घ्यावी लागेल. याशिवाय नवीन शासकीय अपील समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत केंद्र सरकारच्या प्रतिनिधीचाही समावेश असेल. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधा असणाऱ्या पोस्टवर कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ऋतुराज गायकवाड, सॅमसनवरील दबाव वाढला; चेन्नईसमोर पराभवाची मालिका टाळण्याचे लक्ष्य, दिल्लीशी आज लढत, कशी असेल प्लेइंग-११

हफ्ता न दिल्यानं ट्रक पेटवला, लष्कराचं दीड कोटींचं साहित्य जळून खाक; पोलीस पळून गेले

Latest Marathi News Live Update : मनसे पदाधिकाऱ्याने आरोग्याधिकाऱ्यांना धमकावले

Pune RTE Admission: एक लाखापेक्षा जास्त मुलांची निवड; पुण्यात ‘आरटीई’तून प्रवेश घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत!

MSRTC Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला कात्री! नागपूर-अमरावती प्रवास २६ रुपयांनी महागला; एसटीची १० टक्के भाडेवाढ..

SCROLL FOR NEXT