19 percent water storage in Girna Dam jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : गिरणा धरणात 19 टक्के साठा; विहिरी, बोअर तहानलेल्याच...

सकाळ वृत्तसेवा

स्वप्नील वडनेरे : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या चार, पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरवात झाली आहे. मात्र पावसाने म्हणावा तसा जोर पकडला नसल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे.

सध्या रिमझिम पाऊस होत असल्यामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांची पिकं तारली गेली आहे तर दुसरीकडे तालुक्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पावसाळा सुरू होऊन महिना लोटला गेला असला तरीही, समाधानकारक पाऊस अजूनही झाला नाही. परिणामी, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठला आहे. (19 percent water storage in Girna Dam jalgaon news)

एरवी एप्रिल, मे महिन्यात विहिरी, बोअरवेल आटू लागतात. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा जुलै महिन्याच्या सुरवातीपर्यंत विहिरींना पाणी होते. मात्र पाऊस लांबल्याने तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या होऊ लागल्या आहेत. पावसाला विलंब झाल्याने ऐन पावसाळ्यात तालुक्यातील १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

दुसरीकडे दमदार पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी शेतीचे कामे रखडली आहेत. पेरणी नांगरणी होत नसल्याने बी बियाणे, शेती कामासाठी लागणारे अवजारे, खत, विजेची मोटर यांची देखील मागणी खुंटली आहे. शेती अवजारे विक्रेत्यांवर अधिकच परिणाम झाले आहे. एक एक दोन दोन दिवस ग्राहक येत नाही. आले तरी एखाद ग्राहक येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

प्रकल्पात अत्यल्प साठा

नुकतेच गिरणा धरणातून पिण्यासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले. त्यानंतर गिरणा धरणाचा पाणीसाठा अवघा १९ टक्के शिल्लक राहिला आहे तर मन्याड धरणात फक्त ५ टक्के साठा शिल्लक राहिल्याने तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वलठाण, देवळी- भोरस, कुंझर, ब्राह्मण शेवगे, हातगाव यासारखे लहान प्रकल्प पाण्याअभावी कोरडे पडले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बारा गावांत टंचाई

तालुक्यातील १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाहीत तर अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. तसेच अनेक अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत.

तालुक्यातील पिंपळगाव, तमगव्हाण, रोहिणी, अंधारी, न्हावे, ढोमणे, राजदेहरे, हातगाव, विसापूरतांडा, कृष्णानगर, करजगाव, शिरसगाव, हिरापूर या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दीड महिना उलटूनही तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

"ब्राह्मण शेवगे गावात पावसाचे पाणी योग्यरीत्या अडवल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरातील नागरिकांनी पावसाचा प्रत्येक थेंब वाया न जाऊ देता जमिनीत जिरवला पाहिजे." - सोमनाथ माळी, भूजल वारकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT