Agriculture damage
Agriculture damage esakal
जळगाव

वादळी पावसामुळे पाच तालुक्यात 2 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील पाच तालुक्यात गुरुवारी (ता. ९) झालेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान केळीचे झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

जळगाव, चोपडा, धरणगाव, पाचोरा, भडगाव अशा पाच तालुक्यात नुकसान झाले आहे. यात एकूण ४९ गावातील १ हजार ३७६ शेतकरी बाधित झाले आहेत. केळीचे सर्वाधिक २ हजार ११ हेक्टर नुकसान झाले आहे. पपईचे पाच हेक्टर तर लिंबूच दहा हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा येथे ८ जूनला मोठे नुकसान झाले होते. त्यात २४ गावातील ५८४ शेतकरी बाधित होऊन ३९८ हेक्टवर नुकसान झाले होते. आता पाच तालुक्यात केळी पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत.

कोठे किती नुकसान (हेक्टरमध्ये)

तालुका--केळी--पपई--लिंबू--एकूण

चोपडा--५१७--५--०--५२२.००

धरणगाव--१५--०--०--१५.००

जळगाव--१४२६--०--०--१४२६.००

पाचोरा--१८.८०--०-१०--२८.८०

भडगाव--३४.३३--०-०--३४.३३

एकूण--२०११.१३--५--१०--२०२६.१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT