hapus mango destro season in ratnagiri kokan martahi news
hapus mango destro season in ratnagiri kokan martahi news 
कोकण

हापूसच्या सिजनवर यामुळे झाला परीणाम..

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : फेब्रुवारीच्या अखेरीस पारा वर गेल्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात मोहोराला आलेली कैरी उन्हामुळे पिवळी पडून गेली आहे. हा प्रकार गेले चार ते पाच दिवस सतत सुरू राहिल्यामुळे झाडावरील कैरी टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. त्यातच कीडरोगांचाही प्रादुर्भाव असल्यामुळे फवारणीसाठी अव्वाच्या सव्वा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे.

या वर्षी हापूस हंगामाची सुरवातच अडथळ्यांनी झाली आहे. पाऊस लांबल्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यातील थंडी जानेवारीपासून सुरू झाली. त्यामुळे मोहोर धारणा होण्यासाठी वेळ झाला. बदलत्या वातावरणाचा परिणाम आंबा हंगामावर होणार, हे निश्‍चित झाले आहे. दोन महिन्यांनी हंगाम लांबणीवर पडला असून दरात मोठी घसरण होईल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. 

आंबा उत्पादनावर संक्रांत
पहिल्या टप्प्यात अत्यल्प झाडांना मोहोर आला. त्यानंतर जानेवारी महिन्यात बहुतांश झाडे मोहोरली. फेब्रुवारी महिन्यात काही झाडांना सुपारीएवढी कैरी दिसू लागली होती. अखेरच्या टप्प्यात अचानक हवामानात बदल झाला आणि आंबा उत्पादनावर संक्रांत आली. सरासरी कमाल तापमान ३६ अंशापर्यंत तर किमान तापमान १९ ते २० अंशापर्यंत होते. कातळावरील भागात पारा उच्चांकी होता. या बदलाचा सर्वाधिक परिणाम आंबा पिकावर झालेला आहे.कैरीची गळ होत असतानाच तुडतुडा, थ्रिप्स यासह कीडरोगांचा प्रादुर्भावही कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. अनेक ठिकाणी वांझ मोहोर आल्यामुळे त्यातून उत्पादन मिळणे अशक्‍य आहे. 

मतलई वारे वाहू लागल्यामुळे.....
मार्च महिन्यात मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील उत्पादनावर शेतकऱ्यांनी पाणी फेरले आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यातील उत्पादन मिळावे, यासाठी बागायतदार काळजी घेत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अवाढव्य खर्च करावा लागत आहे.मतलई वारे वाहू लागल्यामुळे..
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे सुपारीएवढी कैरी गळून जाऊ लागली. याच कालावधीत मतलई वारे वाहू लागल्यामुळे मोहोरही गळून गेला. 
ही परिस्थिती गेले काही दिवस सतत सुरु आहे. हाती आलेले पीक वाया जाताना पाहून बागायतदार हळहळत आहेत. यंदा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यंदा आंबा उत्पादन कमी येणार

आंबा उत्पादन कमी येणार हे अपेक्षित आहे. तरीही भविष्यात दर स्थिर ठेवण्याची भिस्त मोठ्या मार्केटमधील दलालांवर आहे. ती बाजू सांभाळली गेली नाही तर अनेक आंबा बागायतदारांना व्यवसायातून निवृत्त व्हावे लागेल.
-राजेंद्र कदम, बागायतदार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT