खोपोली : खोपोली परिसरात बांधकाम क्षेत्राने पुन्हा श्री गणेशा केला आहे. 
कोकण

खालापूर-खोपोलीतील बांधकाम व्यवसायाने पकडला वेग; थांबलेल्या कामांना सुरुवात

अनिल पाटील

खोपोली : बांधकाम व्यवसायात आर्थिक मंदी सुरू असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. यात अन्य व्यवसायांबरोबर बांधकाम व्यवसायही बंद पडला. या दरम्यान रोजगार नसल्याने या क्षेत्रातील मोठ्या संख्येने मजूर व कामगारांनी आपापल्या मूळ गावी पलायन केले. सरकारची परवानगी मिळूनही हा व्यवसाय मंदावलेलाच होता; मात्र कामगार पुन्हा परतत असल्याने ऑगस्ट महिन्यापासून हा व्यवसाय पुन्हा रुळावर येत आहे. 

खोपोली-खालापूर परिसरात रियल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. रायगड जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक तेजीत असलेला भाग म्हणून खोपोली-खालापूर परिसराकडे गुंतवणूकदार व विकासकांचे लक्ष होते. परंतु, जीएसटी व नोटबंदीच्या निर्णयानंतर या क्षेत्रातही मंदीचे वारे आले. हे क्षेत्र 2020 या वर्षांत यातून बाहेर पडत असतानाच कोरोनाचे नवे संकट आले. त्यात लॉकडाऊनमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.

शासकीय बंदी आणि लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता न होणे, मजुरांचे पलायन अशा अनेक कारणांनी बांधकाम व्यवसाय जवळजवळ ठप्प पडला होता. यामुळे यातील व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि यावर आधारित अन्य व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले होते. 

सरकारकडून मिळालेली परवानगी आणि मजूर व कुशल कामगार परतल्याने ऑगस्ट महिन्यापासून हे क्षेत्र हळूहळू वेग धरत आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडूनही लाभदायक योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये करण्यात आलेली कपात ही महत्त्वाची ठरत आहे. या सर्वांचा एकंदरीत परिणाम म्हणून वर्तमानकाळात येथील बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्र पुन्हा उभारी धरत असल्याचे दिसत आहे. 

रोजगाराचे केंद्र 
येथील बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्र रोजगाराचे मुख्य केंद्र बनले आहे. 20 ते 22 हजार मजूर व कामगार, एक हजारपेक्षा अधिक कुशल व तांत्रिक कामगारांचा यात थेट समावेश आहे. विविध पूरक व्यवसायाच्या माध्यमातूनही शेकडो लहान मोठे व्यापारी व रोजगार अवलंबून आहेत. 

अनेक प्रकल्पांचा श्री गणेशा
लॉकडाऊनमुळे खोपोली-खालापूर परिसरातील 150 च्यावर मोठे आणि 200 हून अधिक लहान प्रोजेक्‍ट बंद पडले होते. नवीन प्रोजेक्‍ट सुरू करण्याची हिंमत कोणीच करत नसल्याची स्थिती आहे. परंतु, ऑगस्ट महिन्यापासून यातील बहुतांश प्रोजेक्‍टने पुन्हा श्री गणेशा करून जोमाने कामे सुरू केली आहेत. 

लॉकडाऊनमुळे बांधकाम व रियल इस्टेट व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे. यातून बाहेर येण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कमधील कपातीचा लाभ होईल, असे वाटत असून हळूहळू कामे सुरू होत आहेत. हे क्षेत्र गतिमान होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून तांत्रिक व आर्थिकस्तरावर पूरक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. 
- अतिक खोत, संचालक, आशियाना ड्रीम होम, खोपोली 

(संपादन : उमा शिंदे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

Central Government Employees and Pensioners: दिवाळीआधी केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांना सरकारकडून मिळणार मोठा दिलासा!

Ashes 2025-26 : मॅथ्यू हेडन विवस्त्र होऊन MCG स्टेडियमला चक्कर मारणार? मुलगी ग्रेसची Joe Root ला एक विनंती, वाचा काय प्रकरण

Jan Aushadhi Kendra: आता घराजवळच स्वस्त औषधे मिळणार! हजारो जनऔषधी केंद्र उघडणार, नवा नियम कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT