आमरस sakal
लाइफस्टाइल

आमरससोबत हे तीन पदार्थ कधीही खाऊ नका

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते.

सकाळ डिजिटल टीम

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते. सध्या बाजारात आंब्याची मागणी वाढली आहे. आंबा खावा पण त्यासोबतच आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. आंबा किंवा आमरसासोबत कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. जर या संदर्भात दुर्लक्ष केले तर आरोग्य आणि त्वचेवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो.

१. पाणी (water)
आमरसाचा आस्वाद घेतल्यानंतर कधीच पाणी पियू नये. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारण १५ मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खा आणि मग पाणी प्या. शक्यतोवर आपण शेवटी आमरस घेत जेवण संपवित असतो. आणि त्यानंतर लगेच पाणी पित असतो पण हे चुकीचे आहे.

२. मसालेदार पदार्थ (spicy food)
जेव्हा जेवणात आपण आमरस खातो तेव्हा साधारण खूप मसाले भाज्या खाणे टाळावं. कारण आंबा पचायला जड असतो. अनेकांना आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते. त्यात मसालेदार पदार्थांमुळे आणखी ॲसिडीटीची होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणं टाळा

३. दही (curd)

दही कोणत्याही फळासोबत खाणे, चुकीचे आहे. कारण आयुर्वेदानुसार ते विरुद्ध अन्न म्हणून ओळखले जातात. आपण सहसा मँगो लस्सी सुद्धा पितो मात्र मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्कशेक घेतल्यास हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT