लाइफस्टाइल

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये

जगभरात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दरवर्षी जगभरातील लाखो अपघातामूळे मृत्यूमुखी पडतात. अनेकांना कायमचे त्यांना अपंगत्व येते. या अपघाताच्या घटना पाहून त्या अनुभवून केवळ त्याच व्यक्ती नाही. तर त्यांचे कुटुंबच नाही तर अशा बातम्या ऐकून इतर लोकांनाही त्याचा धक्का बसतो. अपघातातील लोकांना मदत कशी करावी ज्यामुळे त्यांचे प्राण वाचतील यासाठी पार्श्वभूमीवर जगभरात आज (१७ ऑक्टोबर) जागतिक ट्रामा डे साजरा केला जातो.

जगभरात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड आहे. शासकीय आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी चार लाख मृत्यू अपघातामुळे होतात. दर पाच मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे ट्रामा डे

मेडीकल भाषेत सांगायचे तर ट्रॉमाला अपघात किंवा कोणत्यातरी वाईट घटनेने शारीरावर झालेला आघात मानला जातो. आघात हा रस्ता अपघात, घरगुती हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अनेक घटनांनी घडलेला अपघात असू शकतो. या आघाताचा शारीरावर आणि मनावर परिणाम होऊ शकतो. परंतु काहीवेळा या अपघातांमुळे येणारे शारीरिक अपंगत्व एखाद्या व्यक्तीच्या मनावर परिणाम करू शकते.रोड ट्रॅफिक अपघात ज्यांना 'आरटीए' देखील म्हणतात. हे आघाताचे मुख्य कारण आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)च्या अहवालानुसार, भारतात 2013 मध्ये सुमारे 1 लाख 37 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे.

ट्रामाशी निगडीत काही तथ्य

जगभरात सुमारे दरवर्षी 5 लाख, तर भारतात 10 लाख लोक रस्ते अपघातांमुळे मरण पावतात. तर काहींना शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागतो.जगात होणाऱ्या अपघातापैकी 1/5 अपघात भारतात होतात.आपल्या देशात, दर 2 मिनिटांनी एक रस्ता अपघात होतो. दर 8 मिनिटाला एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो.भारतात रस्ते अपघातांना बळी पडणाऱ्यांमध्ये जास्त तरुणांची संख्या आहे.दरवर्षी आपल्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, विकसित देशांमध्ये 50 टक्के रस्ते अपघात होतात. रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू आणि शारीरिक अपंगत्वाचे प्रमाण कमी होऊ शकते.पण, केवळ रस्ता सुरक्षेसाठी नियम करून हे शक्य होणार नाही. सर्वसामान्यांना रस्ता सुरक्षेचे नियम माहित असणे आणि त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय, लोकांना घरांमधील अपघातांबाबत प्रथमोपचारांची माहिती असणे देखील खूप महत्वाचे आहे. अपघातापासून बचावासाठी काय करावे हे जाणून घेऊयात.

बचावासाठी काय करावे

रस्ता सुरक्षेचे नियम पाळा. वाहन चालवताना सुरक्षा चिन्हे आणि नियमांचे संकेतांचे पालन करा. दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरा. ड्रायव्हींग करताना मोबाईल वापरू नका. जर तुम्ही लाँग रूटचा प्रवास करणार असाल तर छोट्या अंतरावर ब्रेक घ्या. घरी अपघाताची घटना झाल्यास काय करावे. घरातील लहान मुलांना नेहमी विजेचे स्विच आणि टोकदार वस्तूंपासून दूर ठेवा. घरामध्ये आणि वाहनात नेहमी प्रथमोपचार किट तयार ठेवा. पायऱ्या, बाल्कनी, छत आणि खिडक्या यासाठी आवश्यक सुरक्षा कठडे वापरा. CPR सारख्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याच्या टेक्निकबद्दल जागरूक रहा.

काय करू नये

थकलेल्या, झोपलेल्या अवस्थेत किंवा मादक पदार्थाचे सेवन केले असेल अशा स्थितीत ड्रायव्हींग करू नका. ड्रायव्हींग फास्ट करून धोका पत्करू नका. अपघातात बेशुद्ध असेलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे द्रव देऊ नका. एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत झाली असेल. तर डॉक्टर किंवा कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत त्याला हलवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT