HSC Science Students likely to lost 10 marks | HSC News सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार

एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी अनन्यसाधारण असते. विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी वर्षभर मेहनत घेतात. या परीक्षेत मिळणारे एकूण एक गुण खुप महत्त्वाचा असतो. अशात बारावीच्या विद्यार्थ्यासाठी धक्कादायक बातमी आहे. एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्याच आल्याचे बोलले जात आहे. गुणांबाबतचा निर्णय आता नियामकाना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न आहे.

जीवशास्त्राच्या परीक्षेत पहिल्या प्रश्नात 10 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना केवळ पर्याय लिहिला असल्यास अथवा फक्त उत्तर असल्यास शून्य गुण देण्याच्या सूचना परीक्षक आणि नियामकांना देण्यात आल्या आहेत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्यात पर्याय लिहिल्यास तरच गुण मिळणार आहे.

दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर विद्यार्थी या वर्षी ऑफलाईन परीक्षा देत आहे. अशातच या निर्णयाने पेपर तपासणी कठोर दिसत आहे. यावरुन आता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT