Food Poisoning
Food Poisoning सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र

धक्कादायक! शाळेत मध्यान्ह भोजनात आढळला सरडा; 40 विद्यार्थ्यांना विषबाधा

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत (Primary School) विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात सरडा (Lizard) आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शाळेत पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीत सरड्याचे तुकडे आढळले. ही खिचडी खाल्ल्यानंतर 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Poisoning) झाली आहे. (40 students of at primary school in osmanabad affected by food poisoning)

ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (Umarga) तालुक्यात पेठसावंगी (Pethasawangi) येथील असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

शाळेत मिळालेली खिचडी विद्यार्थ्यांनी डब्यात भरून घरी नेली होती. त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या डब्यात सरड्याचे डोके तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डब्यात सरड्याचा तुकडे आढळून आला. खिचडीमध्ये सरडा सापडल्याची माहिती मिळताच पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिली. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची प्रकृतीही ढासळू लागली. तात्काळ डॉक्टरांना बोलवण्यात आले तर तब्बल 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ही खिचडी सुमारे 248 जणांना वाटण्यात आली होती . मात्र त्याचा फटका केवळ 40 विद्यार्थ्यांनाच बसला.

या विद्यार्थ्यांना नांगरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून 18 विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून उमरगा येथे उपचारासाठी नेण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे दिसत आहेत त्यांना शाळेतीलच एका खोलीत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT