crop esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain : पाऊस, गारपिटीमुळं महाराष्ट्रात तब्बल 80 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान; 'या' जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस (Rain) दोन दिवसांपासून थैमान घालतोय.

सकाळ डिजिटल टीम

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस (Rain) दोन दिवसांपासून थैमान घालतोय. या पावसामुळं हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्येही गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.

अनेक शेतकरी आपल्या शेतातल्या गारा गोळा करून बाहेर फेकताना दिसले. विदर्भात वर्ध्यातही अवकाळी पावसाचा संत्र्याच्या पिकाला फटका बसला.

उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलीये. रब्बी पिकांव्यतिरिक्त संत्री, केळी, डाळिंब, द्राक्षे यांच्या लागवडीलाही फटका बसला आहे.

गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. कृषी विभागातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'आतापर्यंत 80,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक नुकसानीमुळं प्रभावित झालं आहे. नुकसान तपासण्यासाठी पंचनामे प्रक्रिया अद्याप सुरू आहे.'

भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) 25 मार्च रोजी पुन्हा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवलीये. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात जवळपास पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं पाऊस आणि गारपिटीमुळं पिकांचं नुकसान झालंय.

अवकाळी पावसामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. कांद्याच्या अतिरिक्त साठ्यामुळं फेब्रुवारीच्या सुरुवातीला भाजीपाल्याची किंमत 1,100 रुपये प्रति क्विंटलवरून 450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरली होती. राज्य सरकारनं कांद्याला 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केलं असताना विरोधी पक्ष आणि कांदा उत्पादकांनी 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचं सर्वोच्च प्राधान्य असेल. आम्ही शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण मदतीचं आश्वासन देतो.” पीक नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT