night curfew  sakal
महाराष्ट्र बातम्या

आजपासून राज्यात नाईट कर्फ्यू, जाणून घ्या काय बंद, काय सुरू?

५० टक्के क्षमतेच्या मर्यादेकडे दुर्लक्ष करून बिनधास्त व्यवहार करणाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा संसर्ग(corona) आणखी वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यासाठी सरकार पातळीवर हालचाली सुरू आहेत. सोमवारपासून राज्यात नवी नियमावली(corona restrictions) लागू होणार आहे. संचारबंदी(curfew) आणि जमावबंदीच्या काळात विनाकारण पाचपेक्षा अधिकजण एकत्र येणाऱ्या आणि रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई (legal action)होणार आहे. ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेकडे दुर्लक्ष करून बिनधास्त व्यवहार करणाऱ्यांना धडा शिकवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लशींचे डोस न घेतलेल्यांवरील बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोना रोखण्यासाठी जाहीर केलेला नियम शंभर टक्के अमलात आणण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. नवे नियम रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू झालेत. त्यामुळे सोमवारी सकाळपासून खबरदारीच्या उपायांनुसारच व्यवहार सुरू राहणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक चिंता वाढवत असल्याने राज्य सरकारने नवी नियमावली तयारी केली आहे.

महत्त्वाचा बदल

  1. पहाटे पाच ते रात्री अकरादरम्यान जमावबंदी

  2. रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळांत संचारबंदी

काय सुरू?

  1. मॉल, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहेही ५० टक्के क्षमतेनेच सुरू राहणार

  2. व्यायामशाळा (जिम) (५० टक्के क्षमतेने)

  3. ब्युटी पार्लर, हेअर सलून (५० टक्के क्षमतेने)

  4. सार्वजनिक वाहतूक सेवा (दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मुभा)

  5. लोकल सेवा

काय बंद?

  1. महाविद्यालये, शाळा

  2. उद्याने, प्राणीसंग्रहालय बंद

  3. मनोरंजन उद्याने, किल्ले

कार्यक्रमांवर नजर

कोरोना नियमांची सर्वच पातळ्यांवर अंमलबजावणी व्हावी म्हणून विविध खात्यांच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या प्रमुखांना सूचना केल्या गेल्या आहेत. दुसरीकडे, लस घेण्याकडे दुर्लक्ष केलेल्यांना सेवा घेण्यास बंदी घालण्यात आल्याने त्याच्या अंमलबजावणीलाही प्राधान्य देण्याची तयारी सरकारने केली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि अन्य यंत्रणांनी केली आहे. लग्न समारंभासह राजकीय-अराजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी पाहणी करून नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.

नियम मोडणाऱ्यांवर काय कारवाई?

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सेवांची तपासणी होणार आहे. त्यांची क्षमता जाहीर करण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांना पाच ते ५० हजार दंड ठोठावला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT