संजय राऊत
संजय राऊत  Sakal
महाराष्ट्र

दादा कुठं मधेच घुसले? संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

सकाळ डिजिटल टीम

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी ट्विट न केल्यानं फडणवीस यांनी टीका केली होती. यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोक केले जात आहेत. तसंच आम्हीच जिंकू, बहुमत मिळवू असेही दावे केले जात आहेत. यातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गोव्याच्या निवडणुकीवरून (Goa Election) सेनेवर टीका करताना मनाचे मांडे मानू नये असा टोला लगावला होता. याला आता शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जयंतीनिमित्त काँग्रेसच्या (Congress) दिल्लीतील नेत्यांनी ट्विट न केल्याबद्दल फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही राऊतांनी समाचार घेतला.

सजंय राऊत म्हणाले की, फडणवीस आमचे प्रिय नेते आहेत. त्यांची वेदना मी पाहिली. देवेंद्र फडणवीस यांची वेदना राहुल गांधीं, सोनिया गांधी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ट्विट का करत नाहीत अशी आहे. त्यांनी ट्विटचं सोडून द्यावं पण भाजपसोबत बाळासाहेबांचे चांगले संबंध होते. मग त्यांच्या नावाचा केंद्र सरकारने पद्मविभूषणसाठी का विचार केला नाही. पद्म पुरस्काराची यादी आली तेव्हा मला जास्त आश्चर्य वाटलं असंही राऊत यांनी म्हटलं.

पद्म पुरस्कारांसाठी कोणते निकष?

पद्मपुरस्कारांच्या घोषणेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्या कुणालाही उठसुठ पद्म पुरस्कार दिले जात आहेत. बाळासाहेब ठाकरेंना का पद्मविभूषण दिला नाही? पद्म पुरस्कार देताना कोणते निकष लावले जातात याबद्दल आश्चर्य वाटत असल्याची भावनाही राऊत यांनी व्यक्त केली.

गोव्याचे प्रभारी चंद्रकांत पाटील कधी झाले?

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'ते म्हणतायत बहुमत मिळेल तर लोकशाहीत निवडून, जिंकून येण्याचा अधिकार आहे. आणि गोव्याचे प्रभारी चंद्रकांत पाटील कधी झाले. मी तर ऐकलं देवेंद्र फडणवीस प्रभारी आहेत. दादा कुठं मधेच घुसले? त्यांच्या २२ जागा येऊदेत नाहीतर २४ येऊदेत, त्यांना शुभेच्छा.'

उद्धव ठाकरे उद्यापासून सक्रीय होतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रिया झाल्यानंतर बाहेर कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते. व्हर्च्युअल पद्धतीने काही बैठकांना मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. त्यावरून केलेली टीका ही अत्यंत घृणास्पद होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर टीका केली होती. पातळी सोडली होती. आज मुख्यमंत्री वर्षा बंगल्यानंतर शिवाजी पार्कवर आहे. ते उद्यापासून सक्रीय होतील असंही राऊतांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT