maharashtra police
maharashtra police ESAKAL
महाराष्ट्र

कायदा मोडल्यास सहा महिन्यांची शिक्षा! मनसे पदाधिकारी अन्‌ सोशल मीडियावर वॉच

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलिसांनी तर ग्रामीणमधील काही कार्यकर्त्यांना संबंधित पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नेत्यांच्या सांगण्यावरून कोणतेही प्रक्षोभक वर्तन, भाषण, घोषणाबाजी किंवा गैरकृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यातून स्पष्ट केले आहे. या नोटिशीनुसार संबंधिताला किमान सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

सध्या रमजान ईद, बसवेश्वर जयंती, शिवजयंती, अक्षय तृतीया, दुर्गाष्टमी असे सर्व धर्मीयांचे सण-उत्सव साजरे होत आहेत. विविध धर्मीयांचे सण-उत्सव पारंपरिक रीतिरिवाज, चालिरीती व प्रार्थनेने साजरे केले जातात. पण, राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी तसेच धार्मिक नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. २८ एप्रिलच्या आदेशानुसार सोलापूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू झाले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरण्यास बंदी असून इतरांना इजा होईल अशी काठी, शस्त्र जवळ बाळगणेही गुन्हा ठरणार आहे. दरम्यान, आठ पदाधकाऱ्यांनाच पोलिसांनी नोटीस दिल्याचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर यांनी सांगितले. तर ग्रामीण पोलिसांनी तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बोलावून शांतता पाळावे, असे आवाहन केले आहे.

  • नोटिशीतील ठळक बाबी...
    - जमावबंदी व शस्त्रबंदीच्या आदेशाचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करावे
    - सहकारी, पाठिराखे व समर्थकांकडून कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी
    - कोणतेही प्रक्षोभक भाषण, वर्तन, घोषणाबाजी किंवा बेकायदेशीर कृत्य होऊ नये
    - समाजातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य घडल्यास त्याबद्दल कायदेशीर कारवाई होईल
    - गुन्हा दाखल झाल्यानंतर भक्कम पुरावा म्हणून ही नोटीस न्यायालयात सादर केली जाईल

नोटिशीतील कलमानुसार...
नोटिशीतील बाबींचे उल्लंघन करून कायदा हातात घेतल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१)(३) १३५ नुसार कारवाई केली जाणार आहे. जमावबंदी, शस्त्रबंदीचा नियम मोडणाऱ्यांविरुद्ध सर्वप्रथम ३७(१)(३) हे कलम लागते. त्यानंतर १३५ अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई होते. या कलमांनुसार समोरील व्यक्तीला किमान सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त
अक्कलकोट, बार्शी येथे राज्य राखीव पोलिस बलाची प्रत्येकी एक तुकडी असेल. तसेच ग्रामीणमधील सात पोलिस उअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी १५ पोलिसांची टीम बंदोबस्तासाठी असेल. ग्रामीणसाठी ८०० होमगार्ड आणि जवळपास बाराशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. शहरात साडेपाचशे होमगार्ड आणि जवळपास नऊशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) दंगा पथकाची रंगीत तालिम घेतली. दरम्यान, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवून असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

कोणत्याही गैरकृत्याने सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. काहींना १४१ अंतर्गत नोटीस बजावली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांचा सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर वॉच आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- हिम्मत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT