maharashtra politics balasaheb thakceray
maharashtra politics balasaheb thakceray 
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : शिवसेनेला 'वसंतसेना' असं का म्हटलं जायचं?

सकाळ डिजिटल टीम

७० च्या दशकात महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या कॉंग्रसे सरकारसाठी काम करणारी संघटना म्हणूनच शिवसेनेला हिणवले जात होते.

२०१९ च्या लोकसभेत निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडल्या होत्या. पहाटेच्या शपथविधीपासून ते महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपर्यंतचे सत्तानाट्य संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची राजकीय विचारसरणी पूर्णत: वेगळी असून हे तीन पक्ष एकत्र कसे नांदणार यावर अनेक सवाल उपस्थित झाले होते. दरम्यान, ७० च्या दशकात महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या कॉंग्रसे सरकारसाठी काम करणारी संघटना म्हणूनच शिवसेनेला हिणवले जात होते. तर एका बाजुला वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात शिवसेनेला 'वसंतसेना' असे म्हणूनही ओळखले जात होते. (maharashtra politics)

या एकत्रित तिन्ही पक्षांचा संसार कसा चालणार यावर अनेकांनी भाकित केली होती. धर्मनिरपेक्ष विचारसरणीतील कॉंग्रसे आणि हिंदुत्ववादच्या विचारसरणीतील शिवसेना सत्तास्थापनेसाठी मेळ साधणार का यावर अनेक चर्चांना उधाण आली होती. मात्र एकत्र संसार थाटलाय आता पूर्णत्वाला न्यायचा अशी भूमिका घेऊन अगदी सुरुवातीपासूनच शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि कॉंग्रसेसोबत जमवून घेतले.

भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. उद्धव ठाकरेंचे सौम्य हिंदुत्व आणि 'राष्ट्रवादी'चे शिवस्वराज्य, यामध्ये फार अंतर नसल्याने हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीमध्ये दुय्यम ठरणार, असं मत राजकीय अभ्यासक प्रकाश पवार आघाडीविषयी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना स्पष्ट केलं होतं.

शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली. यानंतर सेननं 1968 मध्ये पहिली युती प्रजा समाजवादी पक्षासोबत केली होती. ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखालील प्रजा समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करून शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. मात्र, ही युती दोन वर्षांतच तुटली होती. त्यावेळी काँग्रेसने देशावर लादलेल्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.

आणीबाणी उठल्यानंतर 1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार काँग्रेसच्या विरोधात निवडून आला नाही. त्याचवेळी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करून आपण निवडणुका जिंकणार नाही. मात्र, विधानसभेच्या दिशेने जाण्यासाठी काहीतरी मार्ग निघायला पाहिजे, यासाठी ठाकरेंनी प्रयत्न सुरू केले होते.

1980 साली इंदिरा गांधी यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असणारे सरकार बरखास्त केले आणि पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या वेळी मात्र बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवार उभे ने करता थेट काँग्रेसचा प्रचार सुरु केला आणि काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र या बदल्यात त्यांनी एक अट घातली होती. या प्रचाराच्या बदल्यात विधान परिषदेवर दोन आमदार निवडून द्या अशी मागणी बाळासाहेब ठाकरेंनी केली होती.

दरम्यान, त्या निवडणुकीत मुंबईत कुर्ला-नेहरूनगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब भोसले यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले ए. आर. अंतुले यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचे मैत्रीचे संबंध होते. त्यापूर्वी, 1970 मध्ये मुंबई महापालिकेत महापौर बनवण्यासाठी शिवसेनेने इंडियन युनियन मुस्लिम लीगसोबतही युती केली होती.

राजकीय अपरिहार्यता म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि 'आययूएमएल'चे नेते गुलाम मोहम्मद बनातवाला यांनी एकत्र सभाही घेतल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडी केली होती. त्यानंतर शिवसेना पहिल्यांदा 1985 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून स्वबळावर निवडून आल्यानंतर शिवसेनेने विधानसभेसाठी भाजपबरोबर युती करत हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Team India Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी CSK च्या 'गुरु'ची चर्चा! पाच वेळचा IPL विजेता कोच घेणार द्रविडची जागा?

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT