Mumtaz on Rajesh Khanna And Anju Mahendroo breakup Google
मनोरंजन

'Rajesh Khanna-अंजू महेंद्रू यांचे ब्रेकअप माझ्यासाठी मोठा धक्का होता', 75 वर्षाच्या मुमताजचा मोठा खुलासा

मुमताज काही दिवसांपूर्वीच इंडियन आयडॉलच्या मंचावर परिक्षक म्हणून उपस्थित राहिल्या होत्या तेव्हा त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींचे खुलासे केले.

प्रणाली मोरे

Mumtaz: प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनी ७० चा काळ गाजवला आहे. त्यांनी आपल्या काळात अनेक टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. राजेश खन्ना यांच्या सोबतच्या त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला खूप पसंत केलं गेलं.

दोघांनी मिळून अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तसंच त्या दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या खास फ्रेंड देखील होत्या. नुकत्याच एका मुलाखतीत मुमताज यांनी खुलासा केला आहे की अंजू महेंद्रू सोबत राजेश खन्नाचं ब्रेकअप झालं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता.(Mumtaz on Rajesh Khanna And Anju Mahendroo breakup)

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुमताज म्हणाल्या,''अंजू राजेश खन्ना यांची खूप काळजी घ्यायची.त्यांच्या खाण्या-पिण्याची तर प्रमाणापेक्षा जास्तच तिला चिंता असायची. राजेश खन्ना आपल्या पार्टनरसोबत नेहमीच डबल डेट वर जायचे,जेव्हा राजेश खन्ना-अंजू वेगळे झाले आणि हे मला कळालं तेव्हा माझ्या कल्पनेपलिकडची गोष्ट घडली असं मला वाटत होतं. कारण ती गोष्ट मला अशक्य वाटायची जेव्हा मी त्या दोघांमधील बॉन्डिंग पहायचे''.

७५ वर्षीय मुमताज म्हणाल्या,''राजेश खन्ना यांच्याकडून काही गोष्टी त्यावेळी योग्य घडल्या नाहीत. जर तुम्ही कोणाला भेटत नाही आहात,तर किमान त्याला फोन करून,भेटून त्या संदर्भात सूचित करायला हवं. तसं त्यावेळी राजेश खन्ना यांनी काहीच केलं नाही''.

'आजही अंजू महेंद्रू यांच्या मनात राजेश खन्ना यांच्याविषयी भावूक भावना आहेत का?' असा प्रश्न मुमताज यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या,''अंजूने कधीच आपल्या ब्रेकअपविषयी काही सविस्तर सांगितलं नाही..ना तेव्हा ना आज''.

मुमताज आणि राजेश खन्ना यांनी 'दो रास्ते','आप की कसम','सच्चा झूठा' असे अनेक हिट सिनेमे दिले. नुकत्याच त्या इंडियन आयडॉलच्या सेटवर उपस्थित राहिल्याचं दिसलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,''राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांचे ट्युनिंग इतकं चांगलं होतं की लोकांना वाटायचं आमचं अफेअर सुरु आहे''.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या होत्या, राजेश खन्नांना तेव्हा वाटायचं की मुमताजनी फक्त त्यांच्यासोबतच काम करावं.

त्या म्हणाल्या, ''कोणा दुसऱ्या अभिनेत्यासोबत माझ्या सिनेमाची घोषणा झाली की राजेश खन्ना खट्टू होऊन कोपऱ्यात जाऊन बसायचे. त्यांनी स्वतः शर्मिला टागोरसोबत इतके सिनेमे केले पण मी फक्त त्यांच्यासोबतच काम करावं असं त्यांना वाटायचं''.

माहितीसाठी इथं सागतो की, १९७४ मध्ये लग्न केल्यानंतर मुमताज यांनी सिनेमात काम करणं हळूहळू बंद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT