ranbir alia wedding
ranbir alia wedding sakal
मनोरंजन

या कलाकारांना 'रणबीर आलिया'च्या लग्नात आमंत्रण नाही, कारणही आहे धक्कादायक..

नीलेश अडसूळ

Ranbir alia wedding : बॉलीवूडच नाही तर समस्त प्रेक्षकगण,चाहतावर्ग ज्यांच्या लग्नाची वाट इतक्या दिवसांपासून पाहत होतं ते रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) अखेर लग्नबंधनात अडकत आहेत. १० दिवसांत ते दोघे चेंबूर येथील आर.के हाऊस मध्ये सात फेरे घेणार आहेत. आपल्या लग्नाच्या तयारीत बिझी असलेली आलिया भट्ट ६ एप्रिल,२०२२ रोजी आयोजित केलेल्या 'आरआरआर' सिनेमाच्या सक्सेस पार्टीला देखील हजर राहिली नव्हती. बातमी कानावर पडतेय की, कपूरांचं चेंबूरमधील पूर्वंजांचं जुनं घर असलेलं 'आर के हाऊस' लग्नासाठी सजवण्यात येत आहे. लग्नस्थळी तयारी सुरु झालीय. या लग्नाला ४५० लोकांना आमंत्रण आहे. पण या ४५० लोाकांमध्ये बाॅलिवूड मधील त्यांचे काही जुने स्नेही आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींना मात्र आमंत्रण देण्यात आलेले नाही. नेमके काय कारण आहे या सेलिब्रिटींना न बोलवण्यामागे हे जाणून घेऊया...

या लग्नात बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान, कतरिना कैफ, कंगना राणौत, सिद्धार्थ मल्होत्रा आणि गोविंदा हे कलाकार आपल्याला दिसणार नाहीत. आपापसातील काही वादांमुळे या सेलिब्रिटींना आमंत्रण दिले नसल्याचे बोलले जात आहे. काय आहे हे वाद यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न...

सलमान खानला लग्नाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही अशी माहीती समोर आली आहे. शिवाय निमंत्रण दिले तर सलमान जाणार का असाही प्रश्न आहे. कारण रणबीर आणि भाईजानचे संबंध काही बरे नाहीत. या विषयी अनेकदा बाॅलिवूड मध्ये बोलले गेले आहे. रणबीर आणि कतरीनाचे प्रेमसंबंध याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. रणबीचे जेव्हा कतरीनासोबत प्रेमसंबंध होते त्यावेळी सलमान आणि रणवीर यांच्यात दुरावा आला होता.

कतरीना कैफचेही असेच काहीसे आहे. कतरीना आणि रणवीर एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास ६ वर्षे ते एकत्र होते. त्यांचेही लग्न होईल असे वाटले होते परंतु काही कारणांमुळे ते फिस्कटले. सध्या ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे कतरीनाही या लग्नात दिसणार नाही.

आलिया भट आणि कंगना यांचे प्रेमाचे संबंध सर्वांनाच ठाऊक आहेतच. कंगना अनेकदा आलियाला उद्देशून वादग्रस्त भाष्य करत असते. नेपोटिझम असेल किंवा आलियाचे सिनेमे कंगना अनेकदा तिला ट्रोल केले आहे. त्यामुळे कंगना लग्नात दिसण्याची शक्यता फारच कमी आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचे आणि आलियाचे सुरुवातीला प्रेमसंबंध होते. नंतर ते वेगळे झाले. त्यानंतर सिद्धार्थ बराच वेळ एकटा होता. त्यांच्यातील संबंध अजूनही काही बरे नाहीत. त्यामुळे सिद्धार्थ या लग्नाला उपस्थित राहणार नाही.

सर्वांचा लाडका गोविंदा याचे आणि रणबीर याचे संबंध जग्गा जासूस या चित्रपटांमुळे बिघडले. त्यावेळी त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या चित्रपटात गोविंदाचा कॅमिओ होता पण तो परस्पर चित्रपटातून वगळण्यात आला. यामुळे गोविंदाने निर्मात्यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर रणबीर आणि गोविंदाचेही संबंध बिघडले. त्यामुळे असे काही कलाकार रणबीर आणि आलियाच्या लग्नात दिसणार नाहीत अशी चर्चा बाॅलिवूडमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT