Vaibhav Tatwawadi
Vaibhav Tatwawadi  Esakal
मनोरंजन

Vaibhav Tatwawadi: सोशल मिडियावरील ट्रोलिंगमुळे वैभव 'सर्किट' होतो?

Vaishali Patil

हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या 'सर्किट' चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चा आहे. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका 'सर्किट' चित्रपटात आहे.

महत्वाचं म्हणजे चित्रपटाच्या टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून आणखीणच वाढली आहे. हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची टिम सर्किटचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

या सिनेमानिमित्तानं ईसकाळने वैभवशी गप्पा मारल्या. ईसकाळच्या पॉडकास्ट मध्ये वैभवनं बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याने सर्किट चित्रपटाबद्दल तर सांगितलंच त्याचबरोबर खऱ्या आयूष्यात कसा आहे. त्याच्या आयूष्यातही कोणी सर्किट आहे का ? तो लग्न कधी करतोय अशा अनेक विषयावर त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

याच ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवला जेव्हा विचारलं गेलं की तो सोशल मिडियावर किती वेळ घालवतो आणि नेटकरी त्याला जेव्हा ट्रोल करतात तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असते? त्यावेळी त्याला सर्किटझाल्यासारखं वाटतं का? यावर वैभवनं खुप छान असं उत्तर दिलं. जे ऐकल्यानंतर वैभव त्याच्या खऱ्या आयूष्यात किती शांत आहे हे कळतं.

वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार असून तो बॉलिवूडमध्येही ओळखीचा चेहरा आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही तगडी आहे. त्यामुळं आपल्या चाहत्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडिया हा खुपच उत्तम मार्ग आहे.

त्यामुळे वैभव हा सोशल मिडियावर बराच सक्रिय असतो. तो त्याच्या पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचे चाहतेही त्याच्या पोस्ट आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

वैभवला या पोडकास्टमध्ये विचारलं की तु सोशल मिडियावर किती वेळं घालवतोस? यावर वैभव म्हणाला की ,तो दिवसभरातला अर्धा ते एक तास हा सोशल मिडियावर घालवतो. सोशल मिडिया हा जीवनाचा भाग असल्यानं तिथं सक्रिय असावचं लागतं. असंही तो म्हणाला.

आता कलाकर असेल तर ट्रोलिंगही आलीच. बऱ्याच वेळा कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जातं. तर वैभववर अशावेळी ट्रोलिंगचा कसा परिणाम होतो किंवा ट्रोल झाल्यानंतर वैभवची काय प्रतिक्रिया असते असं विचारल्यानंतर सोशल मीडियावरचं ट्रोलिंग थेट भाष्य केलं.

तो म्हणला की, तो ट्रोलिंगला मनावर घेत नाही. तोही जीवनाचा छोटासा एक भाग आहे. त्यामुळे तो याच प्रमाण देत बसत नाही. त्याचा परिणाम वैभववर कधीच होत नाही असं त्यांन सांगितलं.

अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तर वैभव तत्ववादीनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दिली त्यामुळे पॉडकास्ट नक्की ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT