bird.jpg 
छत्रपती संभाजीनगर

मानवांची दिवाळी पक्षांची मात्र पळापळी! 

नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (औरंगाबाद) : दिपावलीच्या सणानिमित्त वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाला घाबरत ग्रामीण भागातील पशु-पक्षांनाविस्थापित होऊन आपली दिवाळी गावाबाहेर साजरी करण्याची वेळ शिकल्या सवरल्या माणसांनी आणली आहे. मनुष्याच्या उत्सव प्रियतेचे आपण गोडवे गातो. आभिमानास्पद संकृती वारसा सांगतो. पण आता आपल्याच माणसांनी पारंपारिक सणांचे कसे विकृतीकरण चालविले आहे, याचे हे उदाहरण म्हणता येईल. 

दिवाळीतील दिपोत्सवाला आभिशाप ठरत असलेल्या फटाक्यांमुळे मानवी जीवनावर तर विघातक परिणाम होतच आहे. परंतु फटाक्यांच्या आवाजामुळे वन्यजीव सैरभैर होताना दिसत आहेत. दिवाळीच्या काळात गावापासून दूर माळरानावर निर्वासित पक्षांचे थवे दिसत आहे. या पृथ्वीतलावर केवळ आपणच जगतो आणि जगावे आशीच जणू माणसाची धारणा बनली आहे का, आसा प्रश्न पडतो. 

सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये गोंगाट बंदीचे आदेश जारी करत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेदरम्यान फटाके फोडले जाऊ नयेत, असे बजावले आहे. परंतु या आदेशाची पायमल्ली होते. फटाक्यांमुळे दिवाळीच्या काळात अपघाताच्या प्रमाण वाढले असून पैशाचा अपव्यय करून सल्फरकोल संयुगे, पोटॅश, फॅास्परस, क्लोरेटमुळे होणारा विषारी वायुवांचा प्रादुर्भाव विकत घेण्यासाठी मुलाबाळासह पालकांची गर्दी असते. फटाके फोडून कचरा, धूर ईतर दुष्परिणाम आपण किती दिवस पदरी पाडून घेणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा विचार करता राज्यात फटाक्यांची किमान 100 कोटींची उलाढाल होते. फटाका मार्केटमधील दुकानंची वर्षागणिक वाढणारी संख्या, खरेदीसाठी उडणारी झुंबड अचंबित करून जाते. 

भारतीय संस्कृतीत दिपावलीचा उत्सव मनुष्याच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, आत्मसमाधानासाठी व तेजोवृद्धीसाठी योजलेला असून प्रत्येकाने फटाकेमुक्त दिपावली उत्सव साजरा करण्याची नितांत गरज आहे. यामुळे पैसा व नैसर्गिक हानी रोखण्यासाठी मदत होईल. फटक्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. व त्यावरील होणाराखर्च योग्य ठिकाणी केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. संदीप गुरमे (पोलीस निरिक्षक) 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT