Rejesh Tope
Rejesh Tope 
मराठवाडा

Bird Flu:'बर्ड फ्लूमुळे धोका वाढला, राज्यात लवकरच अलर्ट'

ऑनलाईन सकाळ टीम

जालना : मागील काही दिवसांपासून राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामुळे कोरोनाची साथ सुरु असताना दुसरा आजार पसरणे धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय. बर्ड फ्लू खूपच धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्क्यांएवढा आहे. यामुळे राज्यात हायअलर्ट घोषित करणं गरजेचं असल्याचं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडलं आहे.

जालना येथे टोपे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “देशातील बऱ्याच राज्यांमध्ये बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या बर्ड फ्लूने मृत पावले आहेत. पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. बर्ड फ्लूचा मृत्यूदर 10 ते 12 टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचं मत टोपे यांनी मांडले आहे.

 800 कोंबड्यांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे तब्बल  800 कोंबड्यांचा मृत पावल्याचे वृत्त आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. या सर्व मृत कोंबड्या एकाच पोल्ट्री फार्ममधील आहेत. या घटनेनंतर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इतर कोंबड्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले होते. बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचं महाराष्ट्र देशातील आठवं राज्य बनलं आहे.

मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची प्रकरणं समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT