जालना : अपहरण प्रकरणातील संशयितांना घेऊन जाताना पोलिस निरीक्षक राजेद्रसिंह गौर व इतर.  
मराठवाडा

बारदाना शिवणारा निघाला व्यापाऱ्याचा अपहरणकर्ता 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. तर एक संशयिताचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्याचा जुना बारदाना शिवण्याचे काम करणारा एकजण अपहरणाचा सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे; तसेच दोन वेळा प्रयत्न फसल्यानंतर तिसऱ्या वेळी अपहरणाचा डाव या संशयितांनी साधल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

शहरातील ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे ता. 30 डिसेंबर रोजी पन्नास लाखांच्या खंडणीसाठी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अपहरण झाले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीचे दोन लाख रुपयांसह अपहरण झालेल्या खेराजभाई भानुशाली यांची सुखरूप सुटका केली होती; मात्र या गडबडीत अपहरणकर्ते पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असताना काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात ही घेण्यात आले होते; तसेच अपहरण झालेल्या परिसरासह त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणीही पोलिसांकडून करण्यात आली. होती. दरम्यान, पोलिसांना एका संशयिताची टीप मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी आपल्या पथकासह कन्हैयानगर येथून मुख्य संशयित राहुल सुदाम जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर नांदेडसह इतर ठिकाणांवरून भरत दशरथ भागडे (वय 21, रा. लालबाग, जालना), अजय ऊर्फ गट्टू इंदर जांगडे (वय 23, रा. कन्हैयानगर, जालना) या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. या प्रकरणातील एक संशयित फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील कार आणि गुप्ती यापूर्वीच पोलिसांनी जप्त केली आहे. 
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, हिरामण फलटणकर, विनोद गडदे, अंबादास साबळे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, सोमनाथ उबाळे, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे यांनी केली. 

गाडीत सुरू होता प्रवास 
अपहरणकर्त्यांनी ज्येष्ठ व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना बदनापूर, देऊळगावराजा रोड, अंबड रोडवर सतत कारमध्ये प्रवास सुरू ठेवला; तसेच खेराजभाई भानुशाली यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या मुलाला खंडणीसाठी सतत फोन केले जात होते. 

हिंदीतून संभाषण 
पोलिस मागावर आले तर आपली ओळख त्यांना मिळू नये, म्हणून अपहरणकर्ते हिंदीतून संभाषण करीत होते. त्यामुळे पोलिसांचा तपास इतर दिशेने वळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 

दोनवेळा प्रयत्न 
संशयित आरोपी राहुल जाधव हा व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे जुना बारदाना शिऊन देण्याचे कामही करीत होता, असे तपासात पुढे आले आहे. खेराजभाई यांचा मुलगा दीपक भानुशाली हा आपल्या वडिलांना खूप जीव लावतो, याची माहिती संशयितांना होती. त्यामुळे यापूर्वी दोनवेळा खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो फसला; परंतु तिसऱ्या वेळी खेराजभाई भानुशाली यांचे अपहरण केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी 
या संशयितांनी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या, एक लुटमारी केली आहे. यात एका अभियंत्याला मारहाण करून राहुल जाधव या संशयितांनी कार चोरली होती; तसेच दोन बारदान्याची दुकाने फोडली होती. त्यापैकी एका गुन्ह्यात राहुल जाधव याला अटक झाली होती. तर एक बारदाना दुकानफोडीचा मुद्देमालही स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT