Matdan paithan.jpg 
मराठवाडा

मराठवाडा पदवीधरसाठी ६४.४९ टक्के मतदान॰ सर्वात जास्त परभणी, तर सर्वात कमी बीडमध्ये मतदान

मधुकर कांबळे

औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता.एक) सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत ४० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते तर यावेळी मतदानाचा विक्रमी आकडा झाला आहे. आठ जिह्यांपैकी परभणी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६७.४४ टक्के मतदान झाले असून तर सर्वात कमी बीड जिल्ह्यात ६२.०८ टक्के इतके सरासरी मतदान झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. 

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्लयांच्या ८१३ मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान झाले. सकाळी ८ ते १० या वेळातील पहिल्या दोन तासात ७.६३ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ पर्यंत त्यात वाढ होऊन ते २०.७३ टक्के इतके झाले, दुपारी २ वाजेपर्यंत ३७.०८ टक्के मतदान झाले तर ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले. तर मतदान संपण्याच्या वेळेपर्यंत सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण ३ लाख ७३ हजार १६६ इतके मतदार आहेत त्यापैकी २ लाख ४० हजार ६४९ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात ६७.४४ टक्के मतदान झाले. जालना जिल्ह्यात ६६.५४ टक्के , बीड जिल्ह्यात ६२.०८ टक्के , औरंगाबाद ६३.०५, हिंगोली ६५.५८, नांदेड ६४.०७, लातुर ६६.११ , उस्मानाबाद जिल्ह्यात ६६.९७ टक्के सरासरी मतदान झाले. सकाळी पहिल्या दोन तासात मतदान संथ सुरू होते मात्र दहा वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. १२ वाजेपर्यंत २०.७३ टक्के मतदान होते. त्यात दुपारी २ वाजेपर्यंत १६.३५ टक्के वाढ होऊन ३७.०८ टक्केवारी झाली होती. ४ वाजेपर्यंत पुन्हा १६.२२ टक्के वाढ झाली. 

जिल्हानिहाय सरासरी मतदान 

  • औरंगाबाद - ६७०७४ 
  • जालना - १९८०७ 
  • परभणी - २२०६२ 
  • हिंगोली - १०९९४ 
  • नांदेड - ३१५७८ 
  • लातूर - २७२३० 
  • उस्मानाबाद - २२५२३ 
  • बीड - ३९३८१ 

झालेले मतदान 

  • पुरूष मतदान : १,९५,४६८ 
  • महिला मतदान : ४५,१७८ 
  • इतर : ०३ 

 
गेल्यावेळी चव्हाणांचा १५ हजारांनी विजय 
यापुर्वी २०१४ मध्ये ३ लाख ६८ हजार ३८५ मतदार होते, त्यापैकी १ लाख ४१ हजार मतदान झाले होते. त्यापैकी १ लाख २९ हजार २१ मते वैध ठरली होती. उमेदवारांची संख्या २३ होती. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांना ६८ हजार ७६५ मते मिळाली होती तर शिरिष बोराळकर यांना ५३ हजार ५११ मते मिळली होती. १५ हजार ११८ मतांनी श्री. चव्हाण विजयी झाले होते. यावेळी मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT