corona.jpg
corona.jpg 
मराठवाडा

Corona-virus : उस्मानाबादेत आज प्रथमच सर्वाधिक पॉझिटिव्ह; एकूण बाधितांची संख्या गेली ७२८ वर

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) एका दिवसात तब्बल ७५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांच्या आकडा  ७२८ वर पोहोचला आहे. औरंगाबाद येथून रात्री उशिरा १७८ रुग्णांपैकी तब्बल ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तर ४६५ रुग्ण बरी होऊन घरी परतली आहेत.

कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा आलेख वाढत असल्याने जिल्ह्याची चिंताही वाढली आहे. त्यात बाधित होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने प्रशासनासाठी ही एक मोठं आव्हान उभे राहिले आहे. सोमवारी (ता. २७) एका दिवसात तब्बल सर्वाधिक आत्तापर्यंत ७५ रुग्णांची भर पडली.

सकाळच्या सत्रात आंबेजोगाई येथून आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर उस्मानाबाद येथून चौदा रुग्णांचे अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दोन पॉझिटिव आढळून आले. तर रात्री उशिरा उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेतून ९६ अहवाल आले. यामध्ये २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्री उशिरा पुन्हा औरंगाबाद येथून  १७८ रुग्णांचे अहवाल मिळाले.

यामध्ये तब्बल ४५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे दिसून आले.  त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ७५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण बाधित होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता एकूण बाधित रुग्णांचा आकडा ७२८ वर पोहोचला आहे. यात जमेची एक बाब म्हणजे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले असून अशा रुग्णांची संख्या ४६५ वर गेली आहे.

तर कोरोणाने बळी पडलेल्यांची संख्या ही ३९ वर पोहोचलेली आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडाही मोठा असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनासमोर हे एक मोठं आव्हान असणार आहे. यापूर्वीही आरोग्यमंत्र्यांनी मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्याचा मृत्यूदर वाढत असल्याचे चित्र आहे.

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT