csmt crowd 
मुंबई

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याही लागताहेत रांगा; मग सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार??

सकाळवृत्तसेवा

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने सोमवारपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी नगण्य कर्मचाऱ्यांनी लोकलने प्रवास केल्यानंतर मंगळवारी तीनही रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सायंकाळी कर्मचारी घरी जाताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्याबाहेर कर्मचाऱ्यांच्या रांगा दिसून आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्ट्रीने राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या एकमताने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांसाठी एसटी आणि बेस्टच्या गाड्याने प्रवास करावा लागत होता. कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्याची माहिती कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी मिळाली नाही. परिणामी मंगळवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी तीनही मार्गांवरील रेल्वे स्थानकांवर गर्दी केली होती. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचाऱ्यांची थर्मल तपासणी केली जात असून त्यांचे ओळखपत्र सुद्धा तपासले जात आहे. हीच पद्धत लोकल थांबा असलेल्या सर्वच रेल्वे स्थानकांवर असल्याने मंगळवारी कर्मचाऱ्यांना ऐन घरी जाण्याच्या वेळेत लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या आहे. मात्र या रांगेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. 

मध्यरात्री घोषणेचा रेल्वेला फटका
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 15 जूनपासून लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली. त्यानंतरच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना आतुरता लागली होती. मात्र, रेल्वे विभागाने यासंबंधीतील घोषणा रात्री 11.30 वाजेपर्यंत राखून धरल्याने हा निर्णय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, मंगळवारी याच कर्मचाऱ्यांची रेल्वे स्थानकांबाहेर प्रचंड गर्दी दिसून आली. पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यावश्यक सेवेसाठी मंगळवारी 162 लोकल धावण्यात आल्या असून, रात्रीपर्यंत सुमारे 35 हजार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवास केल्याची माहिती पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली आहे.
 

पश्चिम रेल्वे मार्गांवरील प्रत्येक लोकलमध्ये 700 प्रवाशांनाच प्रवास करता येतो. सध्या 400 प्रवासी प्रवास करत असून कुठेही गर्दी झालेली नाही. तसेच कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन केल्या जात आहे. सोशल माध्यमांवर जुने व्हिडीओ व्हायरल करून पश्चिम रेल्वेच्या कार्याला बदनाम केले जात आहे. 
- रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग आणि कोव्हिडचे नियम पाळण्याचे संपूर्ण प्रयत्न केले जात आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहे. प्रवाशांची गर्दी होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या; तसेच प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनाला सहकार्य केले आहे. यामध्ये नियमांचे कुठेही उल्लंघन करण्यात आले नाही.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: हवेतच घडला थरार... दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान ३०० फूट खाली, १० प्रवासी अन् ४ कर्मचारी जखमी! नेमकं काय घडलं?

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना, विमानतळावर 'एक' फलंदाज नाही दिसला; दौऱ्याला मुकण्याची शक्यता... जसप्रीतनंतर आणखी एक धक्का?

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता

Satej Patil emotional post for father : सतेज पाटलांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट, 'आधारवड हरपला..! दादांनी आयुष्यभर माणसं जोडली'

Marathi Live Updates News: ई-२० पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द

SCROLL FOR NEXT