मुंबई

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालानंतर 'इथे' मिळणार गुणपत्रिका...

संजय घारपुरे

मुंबई : दरवर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणपत्रिका संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातच मिळत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे गुणपत्रिका प्रदान करण्याच्या पद्धतीत बदल होईल, अशी चर्चा होती, मात्र, आता त्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद असताना आणि अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने गुणपत्रिका वाटपासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा महाविद्यालयातच देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक महामंडळ याबाबतच्या सूचना विभागीय कार्यालय तसेच शाळा, महाविद्यालयांना देणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देताना नियमाचे कसोशीने पालन करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

दहावी तसेच बारावीची गुणपत्रिका विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे ती प्रत्येक विद्यार्थ्यालाच देण्याची गरज आहे. ती चूकीच्या हाती पडल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकेसाठी शाळा अथवा महाविद्यालयात जावे लागमार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करताना पूर्णपणे खबरदारी घेतली जाणार आहे, असे राज्य महामंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले. ही गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देत असताना सुरक्षित अंतराचे पालन होईल तसेच सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येणार आहेत. 

मुंबई विभागात गुणपत्रिकेचे वाटप करण्यासाठी दोन दिवस राखून ठेवले जाणार आहेत. त्यासाठीच्या केंद्रात वाढ होईल तसेच केंद्रातील कक्षही वाढवण्यात येणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी गुणपत्रिका घेऊन जातील. आत्तापर्यंत हे वाटप काही तासात होत असे, पण आता यासाठी दोन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना दिवस ठरवून देण्यात येणार आहे, असे मंडळाच्या मुंबई विभागाचे सचिव संदीप सांगवे यांनी सांगितले.

महाविद्यालये या गुणपत्रिका वाटप कार्यक्रमाबाबत समाधानी नाहीत. महाविद्यालयात एक हजार विद्यार्थी शिकत असतात. ते शहराच्या विविध भागातून येतात. सध्या कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे हे विद्यार्थी कसे येऊ शकतील, अशी विचारणा महाविद्यालयातून होत आहे. मुंबई विद्यापीठाने पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. बारावीचा निकाल 16 जुलैस लागला आहे, तर दहावीचा निकाल या महिनाअखेर अपेक्षित आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT