मुंबई : अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर महाराष्ट्र सरकारने 'मिशन बिगीन अगेन' मोहीम सुरू करत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविले. त्यानंतर सरकारी कार्यालये, खाजगी कार्यालये, अनेक व्यावसायिक आणि दुकानदारांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. खासगी वाहनधारकांना, बसगाड्यांना, टॅक्सीना, ओला-उबर टॅक्सीवाल्यांना रस्त्यावर गाड्या उतरण्याची परवानगी मिळाली आहे.
लॉकडाऊनमुळे मुंबईत नोंदणीकृत जवळपास पाच लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा उभा करण्याची गरज असल्याचं मत मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोस म्हणालेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असं विनंती क्वाड्रोस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी याबाबत पत्र पाठवले आहे. 31 मे रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच टॅक्सी आणि रिक्षा यातून प्रवास करता येईल असा निर्णय राज्य सरकारनं दिला. हा आदेश सरकारनं रद्द करावा अशी मागणी क्वाड्रोस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
ते म्हणाले, सरकारने कार्यालये आणि व्यापाऱ्यांना पुन्हा नव्यानं परवानगी दिली आहे. ते म्हणाले की, सरकारने कार्यालये आणि व्यापाऱ्यांना पुन्हा नव्यानं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांना सामान्य कर्मचार्यांना वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
या काळया-पिवळ्या टॅक्सीवाल्यांनी आपली सद्यपरिस्थिती सांगितली आहे. तब्बल 3 महिने काळया-पिवळ्या टॅक्सी बंद आहेत. अनेक टॅक्सी या खराब झालेल्या आहेत. त्यांच्या बॅटरी आणि इंजिने खराब झाली आहेत. टायर पंक्चर झाले आहेत. गाडी चालत नाही. एका जागी टॅक्सी तीन महिने उभी असल्याने उंदरांनी इंजिनाच्या सर्व वायर्स कुरतडून टाकल्या आहेत. या टॅक्सीला दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपये खर्च होणार आहेत. ३ महिने हातावर पोट असलेल्या आमच्या टॅक्सी बंद असल्यामुळे आमच्या कुटुंबाचे प्रचंड हाल होत असल्याचं टॅक्सी चालकांनी म्हटलंय.
'मिशन बिगन अगेन' अंतर्गत टॅक्सींना दोन प्रवासी तर ऑटोमध्ये केवळ एक प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती. जर चुकून कुणी टॅक्सीवाल्याने रस्त्यावर गाडी चालवली तर त्याच्यावर मोबाईल फोटो काढून दंड ठोठावला जात आहे. ट्रॅफिक पोलिस टॅक्सी आणि ऑटो चालकांवर दंड आकारत आहेत आणि तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे गंभीर परिस्थिती असलेल्या वाहन चालकांना त्रास देताहेत. काही ठिकाणी तर त्यांच्या गाड्या ताब्यात घेत असल्याचा आरोप क्वाड्रोज यांनी केला. मुंबईत दोन लाखाहून अधिक टॅक्सी आणि 45 हजारहून जास्त ऑटो रिक्षा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.