सोलापूर

अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणीची लगबग सुरु

राजशेखर चौधरी

अक्कलकोट तालुक्याचा मुख्य हंगाम हा खरिपाचा आहे. शेतकरी मशागत करणे व खत टाकणे याची तयारी मार्च महिन्यापासूनच करीत असतो.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आणि भरवश्याचे हंगाम म्हणून खरीप पिकांकडे (Kharif pick) पाहिले जाते. तालुक्यातील अनेक भागात मागील आठवड्यात बऱ्यापैकी पावसाची नोंद झाल्याने खरीप पेरणीची (Kharif sowing) लगबग सुरू झाली आहे. पण अद्याप तालुक्यातील सर्वच गावात सार्वत्रिक आणि मोठी ओल निर्माण होईल असा पाऊस अपेक्षित असल्याने पावसाचा अंदाज घेत काहींनी उशीर होईल म्हणून पेरणी सुरू करायचे तर काहींनी आणखी वाट बघण्याचे धोरण आखल्याचे दिसत आहे. (kharif sowing has almost started in akkalkot taluka)

अक्कलकोट तालुक्याचा मुख्य हंगाम हा खरिपाचा आहे. शेतकरी मशागत करणे व खत टाकणे याची तयारी मार्च महिन्यापासूनच करीत असतो. सध्या खते व बियाणे यांची निवड व तयारी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. तालुक्यात तूर, उडीद आणि मूग ही पिके दरवर्षी जास्त प्रमाणात घेतली जातात. त्यातून दसरा व दिवाळीच्या काळात हातात पैसा येत असतो. त्यामुळे खरीप हंगाम हा महत्वाचा असल्याने शेतकरी वर्ग विशेष श्रम घेऊन काळजीने याकडे पाहतो.

यावेळी तालुक्यातून चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी 85,650 हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आता अनेक शेतकऱ्यांकडे मागील पाच सहा वर्षातील दुष्काळी परिस्थितीने सांभाळता न आल्याने बैलजोडी नाहीत त्यांनी आता यांत्रिकीकरणाची कास धरत वेगाने पूर्ण करण्याकडे आपला कल ठेवला आहे. तर अजूनही अनेक शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःचे बैलजोडी आहेत आणि घरात स्वतः शेतीची कामे करणारी व्यक्ती आहेत त्यांनी बैलांनीच झालेली पेरणी जास्त चांगली होते.

या उद्देशाने आपली व शेजाऱ्यांनी बैलजोडी घेत सवड पद्धतीने पेरणी करण्यास सुरू केली आहे. खरीप हंगाम धांदल सुरू झाली तर शेतात उत्साह निर्माण होतो आणि एकदा पेरणी मनासारखे पूर्ण झाले तर शेतकरी समाधानी होऊन त्याची पुढील निगा राखण्यास सज्ज होतो. या आठवड्यात कृषी साहित्य विक्री केंद्रावर खते व बियाणे विक्री केंद्रावर तसेच स्थानिक बाजारपेठ पेरणी साहित्य खरेदीस मोठी गर्दी झालेली दिसत आहे. आता जून पूर्ण व जुलैचा आरंभ या काळात कमी जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज घेत पेरणी सुरूच राहणार आहेत.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धवट ओलीवर पेरणी सुरू करू नयेत.पुरेसा पाऊस झाल्यास जमिनीतील उष्णता कमी होऊन खरीप पेरणी चांगली होऊ शकते.बियाणे खरेदी करून त्याची अधिकृत पावती त्याचा टॅग व पिशवी आदी योग्य वेळेपर्यंत सांभाळून ठेवावेत जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.पेरणीस गडबड न करता आणखी पावसाची वाट पाहून पुरेशी ओल घ्यावी.

- सुर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी, अक्कलकोट

(kharif sowing has almost started in akkalkot taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT