ओढ्यांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा महापूर sakal
पुणे

उरुळी कांचन : ओढ्यांमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा महापूर

उरुळी कांचनमधील विदारक चित्र; मैलामिश्रित पाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : येथील ग्रामपंचायत हद्दीतून मुळा-मुठा नदीला जाऊन मिळणाऱ्या ओढ्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचा जणू महापूर पूर आल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच ओढ्यातील पाण्याला रंगही वेगळा दिसत असून ओढ्यातून मैला मिश्रित पाणी वाहत असल्याने परिसरात या पाण्याचा वासामुळे दुर्गंधी सुटल्याने स्थानिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील या ग्रामपंचायत हद्दीत ओढा आहे. या ओढ्याच्या साहाय्याने पावसाचे व इतर पाणी मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर सोडले जाते. परंतु काही नागरिक घरातील कचरा, हॉटेलमधील दूषित अन्न व कचरा, सडलेल्या भाज्या, मैला, चिकनच्या दुकानातील खराब पीस, आदी पदार्थ या ओढ्यात टाकत असल्याने ओढ्याच्या पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे सदर कचरा कुजल्याने त्या ठिकाणावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त वासाला सामोरे जावे लागत आहे.

प्लॅस्टिक तसेच इतर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगावर कुत्री, कावळे, डुक्कर, मोकाट जनावरे गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, गावापासून जवळ असलेली स्मशानभूमी ही ओढ्यापासून जवळ असल्याने अंत्यविधीला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमय वातावरणात अंत्यविधीला जावे लागत आहे. तसेच ओढ्यात दारूच्या बाटल्या, शिवाय पेपरप्लेट किंवा थर्माकोल डिश, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या या गोष्टी अविघटनशील असल्याने या ठिकाणी साचून राहत आहेत. ग्रामपंचायतीने या ओढ्यातील प्लास्टिक पिशव्या व काटेरी झाडे जेसीबीच्या सहाय्याने साफ करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतर्फे उपसरपंच संचिता कांचन यांनी केली आहे.

काटेरी झाडे-झुडपे हटविण्याची मागणी

ओढ्यातील कचऱ्याबरोवर ओढ्यामध्ये मोठमोठी काटेरी झाडे उगवून आली आहेत. काटेरी झाडांना प्लॅस्टिक पिशव्या अडकत असून, पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. त्यातच जलपर्णीमुळे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. याचा त्रास ओढ्या शेजारी राहणाऱ्या व या ठिकाणावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना व या ठिकाणी व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांना बसत आहे. यामुळे ओढ्यांतील काटेरी झाडे-झुडपे हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

"राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केलेलीच आहे, पण शासनाने कडक निर्बंध घालून प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. औद्योगिक क्षेत्रातील प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपन्या बंद झाले तर आपोआपच प्लॅस्टिकच्या पिशव्यांची निर्मिती बंद होईल. तसेच प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश दिले तर ग्रामपंचायत कार्यालयातर्फे ठोस कारवाई केली जाईल."

- संतोष कांचन, सरपंच, उरुळी कांचन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT