Trip Destinations in Maharashtra
Trip Destinations in Maharashtra esakal
टूरिझम

Trip Destinations in Maharashtra : ही आहेत महाराष्ट्रतील टॉप लोकेशन्स; तुम्ही कुठे कुठे जाऊन आलात?

Pooja Karande-Kadam

Trip Destinations in Maharashtra : उन्हाळा तसा सगळ्यांचाच फेवरेट आहे. आबां, कैरी, लोणची, मित्र, सुट्टी आणि बिच असे सगळे कॉम्बिनेशन म्हणजे उन्हाळा. लोकांना सुट्टी पडलेली असते त्यामुळे अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅन्स उन्हाळ्यात बनतात. मे महिन्यात पोरांच्या शाळेला सुट्टी पडलेली असते. त्यामुळे सगळ्या नातलगांचा घोळका घराच्या अंगणात बसलेला असतो.

फॅमिलीसोबत जेव्हा फिरण्याची वेळ येते. तेव्हा निवांत क्षण कुठे मिळेल असे लोकेशन शोधले जातात. हा निवांतपणा शोधण्यासाठी लोकं अनेक मोठ्या शहरात, मेट्रोसिटीत जातात. पण त्यांना म्हणावा तसा निवांतपणा अनुभवता येत नाही. महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत जी तुम्हाला खरंच मिळेल. 

महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. डोंगरदऱ्या, विस्तीर्ण समुद्रकिनारा, लेणी, किल्ले, अभयारण्य, मोठी वनराई. यादी खूपच मोठी आहे. विदर्भ, मराठवाडा असो, किंवा कोकण किनारपट्टी; राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सुंदर पर्यटनस्थळे दडलेली आहेत. फिरायचे म्हटले, तर अख्खे आयुष्यही कमी पडेल, इतकी ठिकाणे आपल्याच राज्यात आहेत. आज आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेऊयात जिथे तुम्हाला उन्हाळी सुट्टीत जाता येईल.

कर्नाळा

आर्किटेक्चर प्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी एक मेजवानी, कर्नाळा हे राजगड जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे. हे ठिकाण उन्हाळ्याच्या उष्णतेपासून भरपूर आराम देते आणि पावसाळ्यात हिरवेगार दिसते. कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख आकर्षणे आहेत. पक्षी अभयारण्य अनेक वन्य प्राणी आणि 220 हून अधिक प्रजातींचे अविफौना यांचे घर आहे.

सातारा

महाराष्ट्रातील पाहण्यासारखे महत्त्वाचे ठिकाण, सातारा हे वेण्णा आणि कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ आहे. प्राचीन लेणी, ऐतिहासिक अवशेष आणि किल्ल्यांव्यतिरिक्त, सातारा हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यात वाहणारे धबधबे, अवाढव्य पर्वत आणि प्राचीन तलाव आहेत. ठोसेघर धबधबा, नटराज मंदिर, नटस्की वेधशाळा, अजिंक्यतारा किल्ला, लिंगमळा धबधबा आणि मायणी पक्षी अभयारण्य ही साताऱ्यातील काही उत्तम ठिकाणे आहेत.

तारकर्ली

पांढरे-वाळूचे किनारे आणि शांत पाण्यासाठी प्रसिद्ध, तारकाली हे कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले एक लहान शहर आहे. व्यावसायिकीकरणाने अस्पर्शित, हे एक नवीन सुट्टीचे गंतव्यस्थान आहे. विविध जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी योग्य, तारकर्लीचे समुद्रकिनारे बारीक टॅल्कम पावडरसारख्या वाळूसाठी प्रसिद्ध आहेत. समुद्रकिनार्यावर असताना, पाण्यात उड्या मारणारे डॉल्फिन आणि सुंदर सूर्यास्ताची दृश्ये चुकवायची नाहीत.

तारकर्लीचे समुद्रकिनारे बारीक टॅल्कम पावडरसारख्या वाळूसाठी प्रसिद्ध आहेत

रत्नागिरी


जगातील सर्वात चवदार आंब्याचे माहेरघर, अल्फोन्सो, रत्नागिरी हे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे आणि एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसरीकडे अरबी समुद्राने वेढलेले आहे. अनेक समुद्रकिनारे, दीपगृहे आणि बंदरे असलेले हे महाराष्ट्राचे बंदर शहर म्हणून ओळखले जाते.

सुंदर खारफुटी, खळखळणारे धबधबे आणि वालुकामय किनारे याला पूर्वीपेक्षा अधिक सुंदर बनवतात. जयगड किल्ला आणि दीपगृह, गणपतीपुळे बीच, स्वयंभू गणपती मंदिर आणि थिबा पॅलेस ही रत्नागिरीतील काही उत्तम ठिकाणे आहेत.

अलिबाग

महाराष्ट्राच्या कोकण भागातील एक लहान किनारी शहर, अलिबाग हे 'मिनी-गोवा' म्हणून प्रसिद्ध आहे. अलिबागच्या शांत किनाऱ्यावर वेळ घालवण्याव्यतिरिक्त तुम्ही अनेक किल्ले आणि मंदिरांना भेट देऊ शकता. कोलाबा किल्ला आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या विस्मयकारक दृश्यांसह, अलिबाग बीच हा शहरातील सर्वाधिक भेट दिलेला समुद्रकिनारा आहे. फोटोग्राफी प्रेमींसाठी, नागाव बीच आणि किहिम बीच ही योग्य ठिकाणे आहेत.

लोणावळा - खंडाळा

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे.

भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.

लोणावळ्यात वर्षापर्यटनासाठी गर्दी होते

अजिंठा एलोरा लेणी

औरंगाबादला ‘दारांचे शहर’ असेही म्हटले जाते. हे भारतामधील एक अतिशय लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. महराष्ट्रात वसलेल्या या शहराचा इतिहास, वास्तूकला आणि नयनरम्य निसर्ग दरवर्षी हजारो पर्यटकांना खुणावणारे आहेत. अजिंठा आणि एलोरा लेण्या ही औरंगाबादमधील दोन सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन ठिकाणं आहेत.

मुख्य शहरातून या पर्यटन स्थळांना बस किंवा टॅक्सीने भेट देता येते. अजिंठा लेण्या ३० कातळांमध्ये कोरलेल्या असून बौद्धकालीन वास्तूशिल्पाचा नमुना मानला जातो. या लेण्या इ.स. पूर्व २ऱ्या शतकांत घडविण्यात आल्या. तर एलोरा लेण्या कातळांत कोरलेल्या असून ३४ हिंदू, बौद्ध तसेच जैन देवलयांचा संगम आहे. यांची घडण इ. स. पूर्व ६व्या शतकांत करण्यात आली.

पंटवटी

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.

काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’पश्चिम भारताची काशी ‘’असे म्हटले जाते.

माळशेज घाट

अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल, तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. 

श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर

रायगड जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आहेत. येथील सुखद हवेची झुळूक, मऊ वाळू आणि समुद्राचे पाणी पर्यटकांना आकर्षून घेते. समुद्री अन्न, मासे, झिंगे, बोंबील यांची दुर्मिळता जाणवत नाही. श्रीवर्धन येथे पेशव्यांचे स्मारक आहे. पेशवे मूळचे श्रीवर्धन येथील होते. हरिहरेश्‍वर शहर हे शांत आणि आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पुळण व हरिहरेश्‍वरचे मंदिर प्रसिद्ध आहे. 

प्रबळगड

महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीने असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात धोकादायक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT