jalyukt shivar sakal
उत्तर महाराष्ट्र

जलयुक्त शिवारच्या कामांचा बोजवारा; लाखोंचा निधी पाण्यात

जलयुक्त शिवारच्या कामांचा बोजवारा; लाखोंचा निधी पाण्यात

सकाळ डिजिटल टीम

वडाळी (नंदुरबार) : शेतकऱ्यांच्या शेतीला व विहिरींना, कूपनलिकेला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, संकटात असणारा शेतकरी समाधानी व्हावा, यादृष्टीने जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची असून, त्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करूनही या योजनेचा शेतकऱ्यांना काडीमात्रचाही लाभ झाला नसल्याचे चित्र वडाळी परिसरात आहे. (nandurbar jalyukt shivar working fraud fund loss)

राज्य सरकार, विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची ठरली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूदही राज्य शासनाने केली. परंतु कामे निकृष्ट केल्यामुळे गेल्या वर्षी पहिल्या पावसातच बंधाऱ्यांना गळती लागली होती. तर काही ठिकाणी बंधारेच पावसात वाहून गेले. यामुळे शासनाचा कोट्यवधीचा निधी वाया जाऊन एक थेंबही पाणी साचले नाही. शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला.

बांधकाम साहित्य निकृष्ट

शहादा तालुक्यात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यांना वर्षभरात गळती लागणे किंवा तुटून पडण्यासारखे प्रकार झाले आहेत. हा सगळा प्रकार मातीमिश्रित वाळू, निकृष्ट खडी आदी साहित्याच्या वापरामुळे झाला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह ठेकेदारही कमी खर्चात बांधकाम कसे होईल, याचाच विचार करतात. त्यात कामाच्या दर्जाचा विचार कधीच होत नाही. त्यामुळे पहिल्या पावसातच बंधारे वाहून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.

पुढारीच झाले ठेकेदार

राजकीय पुढारीच या कामांची ठेकेदारी सांभाळत असल्याने तसेच ठेकेदारांवर या भागातील राजकीय पुढाऱ्यांचे आशीर्वाद असल्याने सहसा त्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. शहादा तालुक्यात राजकीय वरदहस्त असल्याने तसेच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे, लघुसिंचन विभागामार्फत वडाळीसह कोंढावळ, खापरखेडा, बामखेडा त.त., कहाटूळ, कळंबू, जयनगर, धांद्रे, लोंढरे आदी भागांत जबाबदार अधिकारी फिरकत नसल्यामुळे जलयुक्त शिवारातील बंधाऱ्यात पाणी किती मुरले हेच कोणाला कळेना, असे चित्र आहे.

गुणवत्ता तपासण्याची गरज

शहादा तालुक्यातील बहुतेक ठिकाणी खोलीकरणाचे, जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू असून, अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शंका-कुशंकांना खतपाणी मिळत आहे. काम देताना संबंधित ठेकेदारांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे असे प्रकार समोर येत आहेत. मात्र या निकृष्ट कामामुळे शेतकरीराजाची पिळवणूक होत आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी वडाळीसह परिसरातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बंधारे बांधले होते. त्याचे काम निकृष्ट झाले असून, बंधाऱ्याचे एकाच वर्षात एकचे दोन झाले. यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीलाही संबंधित ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत. या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी. तसेच दोषी अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करावी.

- चंद्रकांत निकम, शेतकरी, वडाळी (ता. शहादा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT