शिंदे -फडणवीस रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात - नाना पटोले
अभूतपूर्व बंड आणि ऐतिहासिक राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. मात्र हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार, दिल्ली दौरे, फडणवीस शिंदेंच्या 'स्टेजवरच्या गुजगोष्टी' या सगळ्यामुळे टीकेचा धनी होत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी या दोघांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले की, सरकार येऊन आता २७ दिवस झाले. हे सरकार कायदेशीर चाकोरीत आहे. महाशक्ती कोण हे आता दिसून येतंय. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्री जेवायला दिल्लीत जातात आणि दुपारचं जेवण मुंबईत करतात. सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीये.
पुढे चंद्रकांत पाटलांच्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याच्या विधानावरही पटोले यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या जे पोटात जे होतं ते ओठावर आलंय. भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देऊन त्यांच्यावर उपकार केलेत. एकनाथ शिंदेंना येणाऱ्या काळात कळेल आणि पश्चाताप होईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.