Jyeshtha Gauri Puja esakal
संस्कृती

Jyeshtha Gauri Puja : गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात, माहितीये?

गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडक्या गौरीसाठी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

Jyeshtha Gauri Puja : गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या आगमनाने घरात चैतन्य द्विगुणीत होते. लाडक्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच गौराईचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण कोकण आणि अन्य काही भागांमध्ये गौराईचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गौराई पूजनाला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. महत्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जाते.

'या' तिखटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं

गौराईसाठी मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तर गौरीसाठी वाईन देखील ठेवली जाते. गौराईच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही.

तिखटाचा नैवेद्य दाखवण्याची कथा

असे सांगितले जाते की, पौराणीक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतिला आपले भूतगण दिले. हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला.

गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना समशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले

या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते. कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Australia 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ विजयाचे फटाके फोडणार? रोहित-विराट पुन्हा असेल केंद्रस्थानी...

Gold Prices Fluctuate : सोन्याचा दर सकाळी वाढला, रात्री घटला; दर काय राहणार सराफ व्यावसायिकांचे लक्ष

Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज....

'शनिवारवाड्यात मस्तानी यांनीसुद्धा अनेकदा नमाज पठण केलं असेल'; वादानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपवर निशाणा

Shocking Crime in Bhind : अमानुष अत्याचार! दलित तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण; जबरदस्तीने पाजली लघवी, आरोपी फरार

SCROLL FOR NEXT