ghat roadq
ghat roadq 
मुंबई

सावधान! कोकणात जाणारे चारही घाटमार्ग धोकादायक स्थितीत; वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास...

सुनील पाटकर

महाड (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्ग तसेच रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांना जोडणारे मुंबई-गोवा महामार्ग व अन्य राज्य मार्गावरील चार प्रमुख घाट पावसामुळे धोकादायक होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागत आहे.

या प्रमुख घाटांत वारंवार होणारे अपघात व पावसाळ्यात होणारे भूस्खलनामुळे वाहतूक व्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. कोकणातील प्रवास हा घाटातूनच होत असतो. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, पुणे, सातारा अशा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी घाटात वापर करावा लागतो. कोकणातून अन्य ठिकाणी जायचे असेल तर घाटाला पर्याय नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट, महाड-पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट तर महाड-पुणे-पंढरपूर मार्गावरील वाघजई वरंध घाट हे या भागातील प्रमुख रस्त्यावरील महत्त्वाचे घाट आहेत. 

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... ​

यासर्व घाटांतून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक सुरू असते. पावसाळ्यात या घाटातील प्रवास म्हणजे संकटाला निमंत्रण अशी स्थिती वाहनचालकांची झाली आहे. आपत्कालीन स्थितीत या घाटांना जवळचे पर्यायी मार्ग नसल्याने अनेक वाहनचालकांना घाट बंद झाल्यानंतर दूरचा प्रवास मार्ग अवलंबावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांची व प्रवाशांची मोठी गैरसोय होते. घाटांचे रुंदीकरण, मोऱ्या वाढवणे, रिफ्लेक्टर फलक, बॅरी गेटर्स अशा कामांची पूर्तता करण्यात येत असली तरीही अनेक कामे बाकी राहिली आहेत. अतिवृष्टीमुळे खचणाऱ्या घाट यामुळे बांधकाम विभागालाही नांगी टाकावी लागलेली आहे. अशा नैसर्गिक संकटांचा सामना वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. 


कशेडी घाट

  • 19 किलोमीटर लांबी
  • मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा घाट
  • गणेशोत्सवात वाहतूक कोंडी
  • रस्ता खचण्याचा व दरड कोसळण्याचा धोका
  • धामणदेवी, भोगाव, चोळइ ठिकाणी धोकादायक.

आंबेनळी घाट

  • 26 किलोमिट लांबी
  • सातारा, कोल्हापूर, वाई, महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वापर
  • मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात
  • बाहुली टोक, दाभीळ टोक व कॉर्नर, रेडका धबधबा व चिरेखिंड भाग धोकादायक

वाघजई वरंध घाट

  • 22 किलोमीटर लांबी
  • महाड-पुणे मार्गावर अरुंद रस्ता अवघड वळणे
  • वाघजाई मंदिर माझेरी धोकादायक व अनेक धोकादायक वळणे 

ताम्हिणी घाट

  • 16 किलोमीटर लांबी
  • महाड, माणगाव, श्रीवर्धन या मार्गातील पुण्याकडे जाण्यासाठी उपयुक्त
  • दरडीचा धोका

भाजी व मालवाहतुकीसाठी आम्हाला वेगळ्या घाटातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात मात्र या घाटातील प्रवास जोखीम लक्षात घेऊन आम्ही करत असतो.
- तुळशीराम माने, वाहनचालक

महाड बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या घाटांची पाहणी करण्यात आलेली आहे. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक तत्त्वावर ठेकेदार नेमले असल्याने दरड कोसळली तर तत्काळ यंत्रसामग्रीसह मदतकार्य पोहोचून दरडी काढण्याचे काम तत्काळ केले जाते.
-बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता, महाड

--
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT